आरक्षणामुळे राजकारण गुंडाळले
By Admin | Updated: January 22, 2015 00:33 IST2015-01-22T00:33:24+5:302015-01-22T00:33:24+5:30
राजकारणातून जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळेल म्हणून गुढघ्याला बाशींग बांधून असलेले नवशिखे राजकारणी व वारंवार प्रतिनिधीत्व करणारे ...

आरक्षणामुळे राजकारण गुंडाळले
लाखांदूर : राजकारणातून जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळेल म्हणून गुढघ्याला बाशींग बांधून असलेले नवशिखे राजकारणी व वारंवार प्रतिनिधीत्व करणारे राजकारणी यांनी आरक्षणाचा चांगलाच फटका बसला. दिग्गजांचे राजकारण आता बसणात गेल्याचे चित्र दिसत आहे.
राजकारणातील सत्तेचा आनंद हा वेगळाच असतो. पहिल्यांदा निवडून येवून राजकारणाचा आनंद लुटणाऱ्यांना दुऱ्यांदा जेव्हा आरक्षणाचा फटका बसतो तेव्हा मात्र चांगल्या चांगल्यांचे राजकारणाचे अस्तित्व धोक्यात येते. असाच प्रकार तालुक्यात आरक्षण जाहीर होताच काहीशे दिसून आले. तालुक्यात एकूण ६ जिल्हा परिषद क्षेत्रासाठी सर्वच पक्षाचे दिग्गज राजकारणी निवडणूक लढण्यासाठी सदैव तत्पर असतात. मागील काही दिवसापासून अनेकांनी आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच फिल्डींग लावली. मात्र आरक्षण जाहीर होताच संधी हुकल्याचे हुंदके देत आरक्षणाच्या आधारावर नवीन चेहरे कोण राहणार म्हणून निकटवर्तीय उमेदवाराची शोधमोहिम सुरू झाली.
तालुक्यातील पिंपळगाना जिल्हा परिषद क्षेत्र हा माजी जि.प. अध्यक्ष अॅड. वसंता ऐंचिलवार यांचा बालेकिल्ला. या क्षेत्रातून ते अनेकदा निवडूण आले. परंतू यावेळी अनेकांची पुन्हा त्यांनाच पसंती असताना अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव असल्याने त्यांची संधी हुकली. आता या गणातून भाजपाचे पं.स. सदस्य अजय रामटेके हे संभाव्य उमेदवार म्हणून पसंती दर्शवली जात आहे.
मागील निवडणुकीत सरांडी गावातून काँग्रेसचे मनोहर महावाडे यांनी भाजपाचे वामन बेदरे यांचा पराभव केला होता. परंतु यावेळी भाजपा-काँग्रेसमध्ये उमेदवारीसंदर्भात चूरस असताना अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी गण राखून ठेवल्याने हा गण सुद्धा वामन बेदरे यांना सोडावा लागणार आहे. लाखांदूर गावातून नलिनी खरकाटे यांनी पाच वर्षाचा कार्यकाल यशस्विरित्या पार पाडला. या निवडणुकीमध्ये त्यांना संधी मिळणार होती. मात्र हा गण अनुसूचित जाती सर्वसाधारण करीता राखीव असल्याने त्यांच्याही राजकारणावर गदा आली. भागडी जिल्हा परिषद गण हा काँग्रेसचे प्रकाश पाटील देशकर यांचा गड. मात्र आता सर्वसाधारण महिलेसाठी हे क्षेत्र आरक्षीत असल्याने पुरूष राजकारणी थंड बस्त्यात गेले आहेत. (तालुका प्रतिनिधी)