शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 17:00 IST

गेल्या वर्षभरात ९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना शिस्त लावताना पोलीसदादांना स्वत:चे आरोग्यही सांभाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील ७७० कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले. त्यापैकी ५२ अधिकारी आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली असली तरी ९ जण कोरोनाबळी ठरले.

ठळक मुद्देआतापर्यंत नऊ जणांनी गमावले प्राण, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वाढला पोलिसांवरील ताण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी लढ्यात आघाडीवर राहणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांना आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही आघाडीवर राहून परिस्थिती हाताळावी लागत आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांवरील जबाबदारी आणखीच वाढून त्यांचा कोरोबाधितांशी संपर्क वाढत आहे. गेल्या वर्षभरात ९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना शिस्त लावताना पोलीसदादांना स्वत:चे आरोग्यही सांभाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील ७७० कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले. त्यापैकी ५२ अधिकारी आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली असली तरी ९ जण कोरोनाबळी ठरले. बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असल्यामुळे कोरोनाच्या विषाणूपासून स्वत:चा बचाव करणे फिल्डवर काम करणाऱ्यांसाठी अत्यंत कठीण बाब झाली आहे. विशेष म्हणजे फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरुवातीलाच लस देण्याचे नियोजन केले होते; पण दुर्गम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लस घेण्यासाठी जिल्हा मुख्यालयी किंवा तालुका मुख्यालयावरील केंद्रात जाणेही शक्य झाले नसल्यामुळे अनेक जण लसीपासून वंचित आहेत; पण त्यांच्यासाठी आता थेट त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा जवळपासच्या आरोग्य केंद्रावर जाऊन लस देण्याचे नियोजन केले जाणार आहे.पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत २६९० पोलीस कर्मचारी आणि १६५ अधिकाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय ३७३ कर्मचारी आणि ३० अधिकाऱ्यांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. मात्र, अजून ४० टक्क्यांच्या आसपास कर्मचारी-अधिकारी लसीच्या प्रतीक्षेत आहेत.लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना चौकाचौकात रोखताना, त्यांची चौकशी व कारवाई करताना, नाकाबंदीत ड्यूटी करताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी येणारा संपर्क आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. 

आई-बाबा, स्वत:ची काळजी घ्या...

पोलीस खात्यात ड्यूटी करताना बाबांना कधी किती वेळ होईल, हे माहीत नसते. बाहेर ते एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले तरी समजत नाही. आम्ही पोलीस क्वॉर्टरच्या मोजक्या जागेत राहतो. त्यामुळे घरी आल्यानंतर सर्वांशीच त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.- कृतिका गेडामपोलीस कर्मचाऱ्याची मुलगी

पोलीस खात्यात ड्यूटी करणाऱ्याला वेळेचे बंधन नसते. रात्री-बेरात्री घरी आल्यानंतर ते आंघोळ करू शकत नाही. दररोज कपडेही धुवायला टाकणे शक्य नसते. त्यामुळे आईने कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी हेच आमचे सांगणे असते. आमचे सर्व नातेवाइकांचे आईला हेच सांगत असतात. - धनंजय पोटावीमहिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा

 

टॅग्स :Policeपोलिस