शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

By admin | Updated: February 26, 2015 00:24 IST

कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत...

मोहाडी : कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत पाठविण्याची प्रथा सुरु असल्याने शासनाच्या ‘त्या’ आदेशाची अवहेलना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी तसा आदेशच काढला होता. कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आला तर सर्वप्रथम त्याची तक्रार घ्यावी. तक्रार कोणत्या स्वरुपाची आहे हे ठरवुनच नंतर कारवाई करावी. तक्रार जर दुसऱ्या पोलीस ठाण्याशी संबंधित असेल तर तक्रार स्विकारून ती संबंधित ठाण्याकडे पाठवावी. मात्र, तक्रारकर्त्याला परत पाठवु नये असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र मोहाडी पोलीस ठाण्यातुन अनेक लोकांना तक्रार न घेताच परत पाठविले जात असल्याची अनेकांची तक्रार आहे.दिनांक २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता जहीमाबी सैय्यद (७८) ह्या घरगुती भांडणाची तक्रार देण्यासाठी नातवासोबत गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यास स्टेशन डायरी अंमलदार धांडे याने नकार दिला. ह्या बाबत स्थानिक एका पत्रकाराने धांडे यांना तक्रार न घेण्याचे कारण विचारले असता तो तक्रार घेण्यास तयार झाला. मात्र, लेखी तक्रारीच्या दुसऱ्या प्रतिवर (ओसी) स्वाक्षरी करण्यास त्याने नकार दिला तसेच एका तासानंतर बिट जमादार गिरीपुंजे यांना स्वाक्षरी मागा असे सांगीतले. पोलीसांच्या जनतेप्रती असहकार वृत्तीमुळेच जनतेत पोलीसांप्रती सहानुभुती लुप्त होत असुन जनताही पोलीसांना सहकार्य करण्यास सहजासहजी तयार होत नाही. आणि एखाद घटना घडल्यास पोलीसांवर रोष काढल्या जातो. याला जबाबदार पोलीसांची अशीच कार्यप्रणाली कारणीभुत असते. याकडे पोलीस विभागाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. (शहर प्रतिनिधी)मोहाडीची सुरक्षा रामभरोसेपोलीस ठाणे मोहाडी येथील ठाणेदार जोतीराम गुंजवटे हे मागील एक महिण्यापासुन रजेवर गेले आहेत. त्यांच्या ठिकाणी मधुकर गिते यांना पाठविण्यात आले होते. मात्र त्यांचीही बदली पवनी येथे करण्यात आली असल्याने ७० हजार नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी आता रामभरोसे आहे. एपीआय दर्जाचे एकच अधिकारी असलेले सुहास चौधरी यांच्याकडे संपुर्ण ६७ गावांची जबाबदारी आली आहे. वैनगंगेच्या बलीकडील व येथुन ४५ कि.मी. दुर असलेल्या जंगलव्याप्त करडी क्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी एकाच अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.