शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

By admin | Updated: February 26, 2015 00:24 IST

कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत...

मोहाडी : कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आल्यास त्याची तक्रार घ्यावी त्याला परत पाठवु नये, असे शासनाच्या गृहमंत्रालयाचे आदेश असतांनाही मोहाडी प ोलीस ठाण्यात तक्रार कर्त्याला परत पाठविण्याची प्रथा सुरु असल्याने शासनाच्या ‘त्या’ आदेशाची अवहेलना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी तसा आदेशच काढला होता. कोणताही व्यक्ती तक्रार घेवुन आला तर सर्वप्रथम त्याची तक्रार घ्यावी. तक्रार कोणत्या स्वरुपाची आहे हे ठरवुनच नंतर कारवाई करावी. तक्रार जर दुसऱ्या पोलीस ठाण्याशी संबंधित असेल तर तक्रार स्विकारून ती संबंधित ठाण्याकडे पाठवावी. मात्र, तक्रारकर्त्याला परत पाठवु नये असे स्पष्ट आदेश आहेत. मात्र मोहाडी पोलीस ठाण्यातुन अनेक लोकांना तक्रार न घेताच परत पाठविले जात असल्याची अनेकांची तक्रार आहे.दिनांक २३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता जहीमाबी सैय्यद (७८) ह्या घरगुती भांडणाची तक्रार देण्यासाठी नातवासोबत गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यास स्टेशन डायरी अंमलदार धांडे याने नकार दिला. ह्या बाबत स्थानिक एका पत्रकाराने धांडे यांना तक्रार न घेण्याचे कारण विचारले असता तो तक्रार घेण्यास तयार झाला. मात्र, लेखी तक्रारीच्या दुसऱ्या प्रतिवर (ओसी) स्वाक्षरी करण्यास त्याने नकार दिला तसेच एका तासानंतर बिट जमादार गिरीपुंजे यांना स्वाक्षरी मागा असे सांगीतले. पोलीसांच्या जनतेप्रती असहकार वृत्तीमुळेच जनतेत पोलीसांप्रती सहानुभुती लुप्त होत असुन जनताही पोलीसांना सहकार्य करण्यास सहजासहजी तयार होत नाही. आणि एखाद घटना घडल्यास पोलीसांवर रोष काढल्या जातो. याला जबाबदार पोलीसांची अशीच कार्यप्रणाली कारणीभुत असते. याकडे पोलीस विभागाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. (शहर प्रतिनिधी)मोहाडीची सुरक्षा रामभरोसेपोलीस ठाणे मोहाडी येथील ठाणेदार जोतीराम गुंजवटे हे मागील एक महिण्यापासुन रजेवर गेले आहेत. त्यांच्या ठिकाणी मधुकर गिते यांना पाठविण्यात आले होते. मात्र त्यांचीही बदली पवनी येथे करण्यात आली असल्याने ७० हजार नागरीकांच्या सुरक्षेची जबाबदारी आता रामभरोसे आहे. एपीआय दर्जाचे एकच अधिकारी असलेले सुहास चौधरी यांच्याकडे संपुर्ण ६७ गावांची जबाबदारी आली आहे. वैनगंगेच्या बलीकडील व येथुन ४५ कि.मी. दुर असलेल्या जंगलव्याप्त करडी क्षेत्राकडे लक्ष देण्यासाठी एकाच अधिकाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.