शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

फुले-आंबेडकरी विचार हेच आजचे क्रांतीसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:45 IST

आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर शहरातील छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रांतीसूर्य जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देडॉ.यशवंत मनोहर : तुमसर येथे व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर शहरातील छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रांतीसूर्य जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.यशवंत मनोहर तर उद्घाटक म्हणून तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी उपस्थित होते.यावेळी डॉ.यशवंत मनोहर म्हणाले, आजच्या काळात माणुसपणाची भावना कमी होवून धार्मिक, सांप्रदायिक, जातीय व लिंगभावात्मक विषमता, तेढ वाढत आहे. अशा काळात समाजात सलोखा निर्माण करावयाचा असेल तर फुले - आंबेडकरी विचारातील विवेक स्वीकारून समाजाचे वैचारिक उत्तयन करावे लागेल. फुले-आंबेडकरांचा परिवर्तनवादी विचार म्हणजे संपूर्ण समाजाला एकसंघ ठेवणारी गुरुकिल्ली आहे.समाजातील निरनिराळ्या जाती व धर्माच्या लोकांना भगिनीभाव व बंधूभाव शिकविणारी ती वाट आहे. जातीअंताची व स्त्री मुक्तीची ती नेमकी दिशा आहे. आजच्या अराजक हुकुमशाहीचा पराभव आपण फुले-आंबेडकरी विचारामधून करू शकतो. म्हणून सर्वांनीच महामानवांना अभिप्रेत असणारा धर्मनिरपेक्ष समाजवाद आणण्याकरिता कटीबद्ध राहावे.वर्तमानातील वाढत्या जातीय धार्मिक दुराव्यामुळे पुरोेगामी, परिवर्तनवादी चळवळींपुढे आव्हान निर्माण झाले आहे. म्हणूनच तुमसरमधील मराठा सेवा संघ, जोशाबा, समता सैनिक दल, सत्यशोधक शिक्षक सभा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी संघटनांनी एकत्र येऊन छत्रपती फाउंडेशनची स्थापना केली आहे.फुले - आंबेडकरांच्या त्यागमय जीवनाची प्रेरणा घेत छत्रपती फाउंडेशनच्या अनेक कार्यकर्त्यांनी देहदान, नेत्रदान व अवयवदानाचा अभिनव कार्यक्रम या निमित्ताने घेतला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रकाश राठोड, गणेशराव बर्वे, डॉ.राहुल भगत, अल्पेश घडले, चंद्रकांत लांजेवार, राजूभाऊ चामट, डॉ.प्रिदर्शना शहारे, राजेंद्र डांगे, टेंभुर्णे, अमरिश सानेकर, नासिर भाई, पठाण आदी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध बांधव भगिनी उपस्थित होते. तसेच तुमसर शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.राहुल डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.रेणुकादास उबाळे यांनी केले.