शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
4
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
5
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
6
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
7
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
8
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
9
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
10
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
11
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
12
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
13
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
14
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
15
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
16
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
17
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
18
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
19
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
20
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

फुले-आंबेडकरी विचार हेच आजचे क्रांतीसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:45 IST

आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर शहरातील छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रांतीसूर्य जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देडॉ.यशवंत मनोहर : तुमसर येथे व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर शहरातील छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रांतीसूर्य जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.यशवंत मनोहर तर उद्घाटक म्हणून तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी उपस्थित होते.यावेळी डॉ.यशवंत मनोहर म्हणाले, आजच्या काळात माणुसपणाची भावना कमी होवून धार्मिक, सांप्रदायिक, जातीय व लिंगभावात्मक विषमता, तेढ वाढत आहे. अशा काळात समाजात सलोखा निर्माण करावयाचा असेल तर फुले - आंबेडकरी विचारातील विवेक स्वीकारून समाजाचे वैचारिक उत्तयन करावे लागेल. फुले-आंबेडकरांचा परिवर्तनवादी विचार म्हणजे संपूर्ण समाजाला एकसंघ ठेवणारी गुरुकिल्ली आहे.समाजातील निरनिराळ्या जाती व धर्माच्या लोकांना भगिनीभाव व बंधूभाव शिकविणारी ती वाट आहे. जातीअंताची व स्त्री मुक्तीची ती नेमकी दिशा आहे. आजच्या अराजक हुकुमशाहीचा पराभव आपण फुले-आंबेडकरी विचारामधून करू शकतो. म्हणून सर्वांनीच महामानवांना अभिप्रेत असणारा धर्मनिरपेक्ष समाजवाद आणण्याकरिता कटीबद्ध राहावे.वर्तमानातील वाढत्या जातीय धार्मिक दुराव्यामुळे पुरोेगामी, परिवर्तनवादी चळवळींपुढे आव्हान निर्माण झाले आहे. म्हणूनच तुमसरमधील मराठा सेवा संघ, जोशाबा, समता सैनिक दल, सत्यशोधक शिक्षक सभा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी संघटनांनी एकत्र येऊन छत्रपती फाउंडेशनची स्थापना केली आहे.फुले - आंबेडकरांच्या त्यागमय जीवनाची प्रेरणा घेत छत्रपती फाउंडेशनच्या अनेक कार्यकर्त्यांनी देहदान, नेत्रदान व अवयवदानाचा अभिनव कार्यक्रम या निमित्ताने घेतला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रकाश राठोड, गणेशराव बर्वे, डॉ.राहुल भगत, अल्पेश घडले, चंद्रकांत लांजेवार, राजूभाऊ चामट, डॉ.प्रिदर्शना शहारे, राजेंद्र डांगे, टेंभुर्णे, अमरिश सानेकर, नासिर भाई, पठाण आदी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध बांधव भगिनी उपस्थित होते. तसेच तुमसर शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.राहुल डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.रेणुकादास उबाळे यांनी केले.