शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा विसर । ३० लाख क्विंटल खरेदीत अद्याप बोनसची रक्कम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गावर मात करीत शेतात पिकविलेला धान शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांचे १०५ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कोरोना संकटाने घोषीत लॉकडाऊनमध्ये शेतकरी अडचणीत आला असून आतापर्यंत जिल्ह्यात खरेदी झालेल्या ३० लाख क्विंटल धान खरेदी झाला आहे. ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपयांचे चुकारे आधारभूत किमतीने देण्यात आले. मात्र शेतकºयांना अद्यापही वाढीव बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे. तर १०५ कोटी ३५ लाख २७ हजार ७५ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. गत महिनाभरापासून कोरोना संसर्गाचे संकट घोंगावत आहे. संचारबंदी आणि लॉकआऊट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना पैशाची गरज आहे. मात्रलॉकडाऊनमध्ये शासनाला शेतकऱ्यांचा विसर तर पडला नाही ना अशी शंका येत आहे.सर्वसाधारण धान १८८५ रुपये आणि अ ग्रेडचा धान १८३५ रुपये प्रती क्विंटल दराने आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात आला. त्यानंतर शासनाने बोनस आणि वाढीव दर असा २५०० रुपये धानाचा भाव झाला. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ आधारभूत किमतीनेच चुकारे करण्यात आले. त्यामुळे वाढीव दराचे कोट्यवधी रुपये शासनाकडे बाकी आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धानाची वाढीव दरासह रक्कम अदा करावी अशी मागणी आहे.९८ हजार शेतकरीजिल्ह्यात १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. ९० आधारभूत केंद्रावर धान खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील ९८ हजार १२८ शेतकऱ्यांनी आपला धान शासनाला विकला. त्यात भंडारा तालुक्यातील ५ हजार २९६ शेतकरी, मोहाडी १४ हजार ५३२ शेतकरी, तुमसर १६ हजार ९८५ शेतकरी, लाखनी १५ हजार ३९३ शेतकरी, साकोली १५ हजार १६३ शेतकरी, लाखांदूर २१ हजार २७१ शेतकरी, पवनी ९ हजार ३८८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व शेतकरी आता वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे धान खरेदीला ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना धान विकणे अडचणीचे जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी