शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा विसर । ३० लाख क्विंटल खरेदीत अद्याप बोनसची रक्कम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गावर मात करीत शेतात पिकविलेला धान शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांचे १०५ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कोरोना संकटाने घोषीत लॉकडाऊनमध्ये शेतकरी अडचणीत आला असून आतापर्यंत जिल्ह्यात खरेदी झालेल्या ३० लाख क्विंटल धान खरेदी झाला आहे. ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपयांचे चुकारे आधारभूत किमतीने देण्यात आले. मात्र शेतकºयांना अद्यापही वाढीव बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे. तर १०५ कोटी ३५ लाख २७ हजार ७५ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. गत महिनाभरापासून कोरोना संसर्गाचे संकट घोंगावत आहे. संचारबंदी आणि लॉकआऊट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना पैशाची गरज आहे. मात्रलॉकडाऊनमध्ये शासनाला शेतकऱ्यांचा विसर तर पडला नाही ना अशी शंका येत आहे.सर्वसाधारण धान १८८५ रुपये आणि अ ग्रेडचा धान १८३५ रुपये प्रती क्विंटल दराने आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात आला. त्यानंतर शासनाने बोनस आणि वाढीव दर असा २५०० रुपये धानाचा भाव झाला. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ आधारभूत किमतीनेच चुकारे करण्यात आले. त्यामुळे वाढीव दराचे कोट्यवधी रुपये शासनाकडे बाकी आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धानाची वाढीव दरासह रक्कम अदा करावी अशी मागणी आहे.९८ हजार शेतकरीजिल्ह्यात १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. ९० आधारभूत केंद्रावर धान खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील ९८ हजार १२८ शेतकऱ्यांनी आपला धान शासनाला विकला. त्यात भंडारा तालुक्यातील ५ हजार २९६ शेतकरी, मोहाडी १४ हजार ५३२ शेतकरी, तुमसर १६ हजार ९८५ शेतकरी, लाखनी १५ हजार ३९३ शेतकरी, साकोली १५ हजार १६३ शेतकरी, लाखांदूर २१ हजार २७१ शेतकरी, पवनी ९ हजार ३८८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व शेतकरी आता वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे धान खरेदीला ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना धान विकणे अडचणीचे जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी