शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा विसर । ३० लाख क्विंटल खरेदीत अद्याप बोनसची रक्कम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गावर मात करीत शेतात पिकविलेला धान शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांचे १०५ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कोरोना संकटाने घोषीत लॉकडाऊनमध्ये शेतकरी अडचणीत आला असून आतापर्यंत जिल्ह्यात खरेदी झालेल्या ३० लाख क्विंटल धान खरेदी झाला आहे. ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपयांचे चुकारे आधारभूत किमतीने देण्यात आले. मात्र शेतकºयांना अद्यापही वाढीव बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे. तर १०५ कोटी ३५ लाख २७ हजार ७५ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. गत महिनाभरापासून कोरोना संसर्गाचे संकट घोंगावत आहे. संचारबंदी आणि लॉकआऊट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना पैशाची गरज आहे. मात्रलॉकडाऊनमध्ये शासनाला शेतकऱ्यांचा विसर तर पडला नाही ना अशी शंका येत आहे.सर्वसाधारण धान १८८५ रुपये आणि अ ग्रेडचा धान १८३५ रुपये प्रती क्विंटल दराने आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात आला. त्यानंतर शासनाने बोनस आणि वाढीव दर असा २५०० रुपये धानाचा भाव झाला. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ आधारभूत किमतीनेच चुकारे करण्यात आले. त्यामुळे वाढीव दराचे कोट्यवधी रुपये शासनाकडे बाकी आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धानाची वाढीव दरासह रक्कम अदा करावी अशी मागणी आहे.९८ हजार शेतकरीजिल्ह्यात १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. ९० आधारभूत केंद्रावर धान खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील ९८ हजार १२८ शेतकऱ्यांनी आपला धान शासनाला विकला. त्यात भंडारा तालुक्यातील ५ हजार २९६ शेतकरी, मोहाडी १४ हजार ५३२ शेतकरी, तुमसर १६ हजार ९८५ शेतकरी, लाखनी १५ हजार ३९३ शेतकरी, साकोली १५ हजार १६३ शेतकरी, लाखांदूर २१ हजार २७१ शेतकरी, पवनी ९ हजार ३८८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व शेतकरी आता वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे धान खरेदीला ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना धान विकणे अडचणीचे जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी