शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
3
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
4
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
5
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
6
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
7
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
8
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
9
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
10
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
11
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
12
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
13
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
14
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
15
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
16
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
17
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
18
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
19
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
20
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:59 IST

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमिवर ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होत आहे. सणा सुदीच्या काळात कोट्यवधींचा महसूल परिवहन मंडळातर्फे राज्य शासनाला मिळत असताना संपामुळेही हा महसूल बुडत आहे.भंडारा व गोंदिया जिल्हा मिळून एकूण सहा आगार आहेत. त्यापैकी चार आगार एकट्या भंडारा जिल्ह्यात आहे. तुमसर, भंडारा, पवनी व साकोली आगाराचा समावेश आहे. भंडारा विभागातून विविध मागण्यांच्या संदर्भात ४०८ पैकी ४०० कर्मचाºयांनी संपात सहभाग नोंदविला आहे. परिणामी भंडारा आगारातून सोडल्या जाणाºया ७४९ बसफेºया रद्द झाल्या. कर्मचाºयांचा हा संप बेमुदत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने सर्वच आगारातील बसफेºया मुख्यालयी येवू न शकल्याने प्रवाशांना खाजगी वाहन सेवेचा उपयोग करावा लागला. एकंदरीत दिवाळीच्या तोंडावर स्वगावी परतणाºया व अपडाऊन करणाºया कर्मचाºयांना चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. शाळेला दिवाळीची सुटी लागल्याने विद्यार्थी वर्गाला त्रासापासून सुटका मिळाली. या संपामुळे बसस्थानक निर्मनुष्य झाले होते. संप असल्यामुळे प्रवाशीही बसस्थानकाकडे फिरकले नाही. दुसरीकडे या संपामुळे लाखोंचा महसूल बुडाला आहे. मागण्यांमध्ये एस.टी. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचाºयांप्रमाणे होण्यासाठी सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणींसह सातवा वेतन आयोग लागू करावा, १ जुलै २०१६ पासून देय होणारा सात टक्के महागाई भत्ता व जानेवारी २०१७ पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करावा, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, १ एप्रिल २०१६ पासून हंगामी वाढ लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला ५०० रूपये याप्रमाणे वर्षभर मोफत पास देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना व कृती समितीचा सहभाग असून या संपाला महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, विदर्भ एस.टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक), कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना व संघर्ष ग्रृपने पाठींबा दर्शविला आहे.मागण्या मंजूर करासाकोली : एस.टी. कर्मचाºयांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला खा. नाना पटोले यांनी आपला पाठिंबा दर्शविला अून जनतेनेही या संपाला आपला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केला आहे. आज ते साकोली येथील बसस्थानक एसटी कर्मचाºयांच्या मंडपाला भेट दिली. संघटनेच्या पदाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून कर्मचाºयांच्या अडचणीसंबंधी चर्चा केली. एसटी महामंडळ हा सध्या तोट्यात नसून नफ्यात आले व हा नफा स्वच्छता अभियानाच्या नावावर खर्च होत आहे. यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी पैसा खर्च करण्यात येत आहे. याची चौकशी करण्यात यावी. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एस.टी. कर्मचाºयांचे पगार कमी आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यास अडचण येत आहे. राज्य शासनाने एस.टी. ला टोलमुक्त करावे तसेच कर्मचाºयांचे वेतन वाढवावे, अशी माहितीही यावेळी नाना पटोले यांनी केली आहे. एस.टी. महामंडळात जुने टायर रीमोल्डीग करून वापरतात व नवीन टायर खरेदीचे बिल जोडण्यात येतात. तसेच डिझल हे बाहेरून भरले जातात याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खा. पटोले यांनी यावेळी केली.१४९ कर्मचारी सहभागीपवनी : एस.टी. आगार व बसस्थानकात कार्यरत १५३ कर्मचारी आहेत त्यापैकी १४९ कर्मचारी संपात सहभागी आहेत. संप करू यासाठी शासन व महामंडळ स्तरावरून प्रयत्न झाले परंतू संपात सहभागी कर्मचारी कार्यवाहीची तमा न बाळगता संपावर राहिले त्यामुळे एस.टी. बस आगारात बसगाड्या रात्री १२ वाजतापासून उभ्या करण्यात आलेल्या होत्या.तुमसर आगारातही संपतुमसर : तुमसर आगारातून २५ बसफेºया सुटतात. परंतु संपामुळे दिवसाकाठी होणारा महसूलही बुडाला. अन्य राज्य सरकारांनी त्यांच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांना ग्रेड पे सह वेतन दिले जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्यातच महामंडळाच्या कर्मचाºयांना कमी वेतनावर काम जास्त व टेंशन अधिक दिले जात आहे.भंडारा विभागातून दिवसाकाठी जवळपास ७५० बसेस सुटतात. संपामुळे या सर्व बसफेºया रद्द झाल्या आहेत.-फाल्गून राखडे, आगार व्यवस्थापक भंडारा.