भीषण तापमानामुळे तलावातील पाणी आटले असून सिहोरा परिसरातील तलावांमध्ये मासोळ्यांच्या मृत्यूचे तांडव सुरु आहे. या प्रकाराने मत्सपालन संस्थांना १० कोटींचे नुकसान झाले आहे. सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या बावनथडी नदीचे पाणी चार महिन्यापूर्वीच आटले आहे. ...
जवाहर नवोदय विद्यालयाच्या विविध विषयांना घेऊन समस्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने नवनिर्वाचीत खासदार सुनील मेंढे यांनी स्वत: पुढाकार घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाचगाव येथे शुक्रवारला बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. ...
दुष्काळी काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून १९७२ साली लाखनी तालुक्यातील देवरीगोंदी येथे तलावाचे काम करण्यात आले. सहा वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तलाव निर्माणही झाला. मात्र कालव्याच्या सदोष कामामुळे अपेक्षित सिंचनच होत नव्हते. ...
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच भारी ठरल्या. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.५६ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा १७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या असून जिल् ...
दहावीच्या परीक्षेत येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे आणि प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया समान ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत. जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला असून गतवर्षीपेक्षा २०.६५ ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासीत व मान्य मागण्याची पुर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी येथील विज्युक्टाचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मल्लिक विरानी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवर दुसºया पुलाचे बांधकाम अतिशय संथगतीने सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन नऊ ते दहा महिने झाले. दरम्यान मुरुम, रेती व सध्या पाणीटंचाईने कामाची गती मंदावल्याचे चित्र दिसत आहे. ...
पकडलेल्या अवैध रेती ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस शिपायासह एका खाजगी व्यक्तीला दहा हजार रूपयाची लाच घेताना मोहाडी येथे रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने केली. ...
तालुक्यातील २३ गावांची तहाण भागविणारी गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गत २० वर्षांपासून भीजत घोंगडे कायम आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण झाल्यानंतर केवळ तीन महिनेच पाणी देण्यात आले. ...