दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्न सोहळे उरकले जातात. त्यामुळे आतापासूनच मुले-मुली पाहण्याच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर ते जूनपर्यंत अनेक लग्नतिथी आहेत. यावर्षी अनेक चांगल्या कामांसाठी मुहूर्त अधिक असल्याचेही ज्योतिषांनी सांगितले आहे. ...
परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच धान पिकाचेही रोग व किडीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच धानाचा बोनस जाहीर करावा, धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे ...
भंडारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने नवीन वाहन खरेदी केल्यानंतर तसेच जुन्या वाहनांची नाव नाेंदणी बदलताना वाहनांची तपासणी केली जाते. त्यानंतर आरसी बुक आणि अन्य कागदपत्रे दिली जातात. यात दुचाकी, चारचाकी तसेच खासगी वाहने यांच्या नं ...
दिवसा घराबाहेर निघाल्यानंतरही काहीच त्रास होत नसून रात्रीला थंड वातावरणात शेकोटी जाळून बसण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांची मजा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात लुटता येत असतानाच शहरी भागातही आता थंडीचा जोर वाढताच शेकोटी हमखास दिसून येते. शिवाय ...
भंडारा जिल्ह्याला रेतीच्या रूपाने मोठे वरदान मिळाले आहे. अख्ख्या महाराष्ट्रात वैनगंगा व बावनथडी नदीची रेती गुणवत्तेत उच्च दर्जाची आहे. रेतीवरच तस्करांचा मोठा डोळा असतो. यामुळे फक्त पावसाळ्याचे काही दिवस वगळता बाराही महिने रेतीसह अन्य गौण खनिजांची खुल ...
वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षकांना सुधारण्याची संधी शिक्षणाधिकारी यांनी संघटनेकडे मागितली होती. तथापि, अधीक्षक यांच्या वर्तनात व कारभारात किंचितही फरक पडला नाही. जिल्हा मुख्याध्यापक संघ व इतर संघटनांनी अधीक्षकांना आधी निलंबित करा व नंतर च ...
प्रशासन काेराेना रुग्णसंख्या कमी झाली तर काेराेना संपला नाही, असे बजावून सांगत असतानाही कुणी नियमांचे पालन करताना दिसत नाही. महिन्याभरापासून तर अनेकांच्या चेहऱ्यावरील मास्कही बेपत्ता झाला आहे. कुणी सॅनिटायझर लावत नाही की, कुणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पा ...
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना रेशन दुकानातून डाळ, साखर गायब झाली आहे. फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना साखर देण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करणार, असा सवाल लाभार्थींमध्ये उपस्थित होत आहे. ...
बुधवारी रात्री निखिल दुचाकीने आपल्या गावी धामनी येथे जात होता. कऱ्हांडला गावानजीक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत निखिल गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. ...
गेली दोन वर्षे गाव व गावांच्या शिवारात आगीच्या घटना घडल्या नाहीत. यामुळे गावकरी रहस्यमय आगीच्या दहशतीपासून दुरावले होते. परंतु, गुरुवारी दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेत शिवारात असणाऱ्या धानाच्या पुंजन्याला त्यांच्या डोळ्यादेखत रहस्यमय आग लागली ...