परतीच्या पावसाने धान उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:44+5:30

दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.

Paddy rains in return rains | परतीच्या पावसाने धान उद्ध्वस्त

परतीच्या पावसाने धान उद्ध्वस्त

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : शेतात पाणी साचून पेंढ्या भिजल्या, काढलेले धान वाचविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धान पीक उध्वस्त केले असून कापणीला आलेला धान पावसात ओला होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणात परतीच्या पावसाने शेतकºयावर संकटाचा डोंगर उभा केला. शेकडो हेक्टरमधील कापलेल्या धानाच्या पेंढ्या (कडपा) पावसात ओल्या झाल्या असून बांध्याही पावसाच्या पाण्याचे तुडूंब भरल्याचे चित्र आहे.
गत आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र धोधो पाऊस कोसळला. दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.
दिवाळीतच पावसाने शेतकºयाचे दिवाळे काढले. तुमसर, साकोली, लाखनी तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका बसला. मोठ्या आशेने शेतकºयांनी धानाची कापणी सुरू केली होती. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
शेतकºयांच्या आशेवर फेरले पाणी
यावर्षी कधी नव्हे ते धानाचे पीक समाधानकारक होते. विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. चांगले उत्पादन येणार असल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धान पिकाची मोठी हानी झाली. शेकडो हेक्टरमध्ये कापणीला आलेला धान आता पावसात भिजल्याने सडत आहे.

दिवाळी सुट्यामुळे पंचनामे लांबणार
परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. परंतु दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पंचनामे लांबण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस सुट्या आहे. नुकसानीचा पंचनामा २४ तासात होणे गरजेचे असल्याने पीक विमा तरतुदीत म्हटले आहे. आता यावर प्रशासन कोणता तोडगा काढते आणि कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे

शेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई द्या- नरेंद्र भोंडेकर
परतीच्या पावसाने जिल्ह्यात विशेषत: भंडारा विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात ते जिल्हाधिकारी आणि महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. आमदार भोंडेकर यांनी भंडारा आणि पवनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. शेतकºयांचे सांत्वन करीत त्यांनी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Paddy rains in return rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस