शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

साहेब, बदाबदा पावसानं आता धान सडू लागले हो.. शेतकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 5:37 PM

पालांदूर परिसरातील बांध्यांना तलावाचे स्वरूप

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : पंधरा दिवस झाले साहेब, पावसानं दम घेतला नाही. जास्तीच्या पाण्यानं धान सडू लागले आहे. काय करावं अन् काय नाही हे सुचेनासं झालं आहे. दुबार पेरणी व रोवणीला पैसा कुठून आणावा, याचंच आता टेन्शन आलं. ही व्यथा आहे लाखनी तालुक्यातील चूलबंद खोऱ्यांतील पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची!

गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. धानाच्या बांध्यांना तलावाचे स्वरूप आले असून, रोवणी झालेले धान पिवळे पडून सड्डू लागले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करतात; मात्र आता सारखा पाऊस कोसळत आहे. पालांदूर मंडळात सरासरी १२१ टक्के पाऊस झाला. पंधरा एकराची कास्तकारी करणारे ढिवरखेडाचे प्रशांत खागर सांगत होते, पाच एकरात धान रोवणी पूर्ण झाली; मात्र पावसाने रोवणी शक्य होत नाही.

रावणी झालेले पाच एकरातील धान सडण्याच्या मार्गावर आहे. नर्सरीतील पऱ्हे पावसाने उद्ध्वस्त होत आहेत. आता पाऊस थांबला की सर्वप्रथम पऱ्ह्यांची तजवीज करावी लागणा आहे. नाही तर शेती पडीक ठेवण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत होते घोडेझरी शिवारात शेत असलेले गजानन हटवार. आनंदराव हटवार म्हणाले, रोवणी झालेल्या धानाला खताची मात्राही देता आली नाही. तणनाशक फवारून उपयोग नाही. बांध्यांत गवत वाढत आहे. पाऊस असाच राहिला तर संपूर्ण धान सडून जाईल. मऱ्हेगाव शिवारात शेत असलेले शेतकरी भगवान शेंडे, दामोधर फुंडे म्हणाले, आम्ही पीक विमा काढला आहे. त्याचा लाभ तरी शासनाने तत्काळ द्यावा.

रोवणी झालेल्या बांध्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. शेतकरी बांध्या फोडून पाण्याचा निचरा करीत असल्याचे दृश्य दिसून आले. गजानन भुसारी म्हणाले, बांध्या फोडून पाण्याचा निचरा केला तरी वरून पाऊस कोसळतच आहे. काही उपयोग होत नाही. आतापर्यंत अतिवृष्टीने ८ ते १० हजार रुपये पाण्यात गेले. पुढेही पीक हाती येण्याची शाश्वती नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा