शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

धानपिके नष्ट; हतबल झालेल्या शेतकऱ्याने शेतात सोडली जनावरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:24 IST

दांडेगाव शेतशिवारातील घटना : दोन महिने लोटूनही मदत नाही

दयाल भोवते लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : पहिल्यांदा आलेल्या पुराने लागवडीखालील धान पन्हे सडले. अन्य शेतकऱ्यांकडून पन्ह्यांची जुळवाजुळव करून धान पिकाची लागवड केली. मात्र, दुसऱ्यांदा आलेल्या पुराने तेही धान पीक नष्ट झाल्याने व शासनाकडून कुठलीही मदत न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने उभ्या धान पिकात जनावरे चारण्यासाठी सोडले. हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव शेतशिवारात उघडकीस आला आहे. कुंडलिक चेपटू घाटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

कुंडलिक यांची दांडेगाव शेतशिवारात नदीकाठावर अडीच एकर शेती आहे. खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यासाठी कुंडलिकने पह्यांची लागवड केली होती. पन्हे लागवडीसाठी आल्यानंतर काही दिवसांत पन्ह्यांची शेतात लागवड करणार तोच पहिल्यांदा अतिवृष्टीने झोडपून काढले. चुलबंद नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे कुंडलिकच्या शेतातील संपूर्ण धान पन्हे पाण्याखाली येऊन सडले.

पूर ओसरताच कुंडलिकने परिसरातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या धान पन्ह्यांची जुळवाजुळव करून पुन्हा धान पिकाची लागवड केली. धान पिकाचे संगोपन करताना त्याने खते व विविध औषधांची फवारणी केली. चुलबंद नदीला आलेले पुराचे पाणी कुंडलिकच्या शेतात शिरल्याने धान पिकाचे पूर्णतः नुकसान झाले.

महसूल प्रशासनांतर्गत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. मात्र, तब्बल २ महिने लोटूनही कुठलीही नुकसानभरपाई न मिळाल्याने संतापलेल्या कुंडलिकने धान पिकांत गावातील शेतकऱ्यांची जनावरे चराईसाठी सोडली. कुंडलिक, त्याची पत्नी व २ मुले असा चौघांचे कुटुंब आहे. घराचा संपूर्ण आर्थिक रहाटगाडा शेतीवर अवलंबून आहे. शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मदत मिळणार तरी केव्हाअतिवृष्टीनंतर पंचनामे करण्यात आले. पुरानंतरही तोच प्रकार पुन्हा घडला. दोनवेळा अस्मानी संकट आल्याने मदत मिळेलच, अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र दोन महिने लोटूनही मदत काही मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलावे लागते. अशीच अवस्था तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांचीही आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराCropपीकAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी