शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकाचे नुकसान, मात्र पीकविमा मिळेना ! शेतकऱ्यांचा वाढतोय रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:30 IST

Bhandara : धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले.

दिघोरी मोठी : परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले धानाचे पीक पूर्णपणे आडवे झाले असून, अनेक ठिकाणी धानाला अंकुर आले असून, कणसे काळी पडून कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या कोलमडला असताना पीकविमा मिळण्यात मात्र विलंब होत आहे.

धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. या ओलाव्यामुळे पीक कुजले, कणसे गळून पडली आणि उत्पादनात मोठी घट येणार आहे.

सरकारकडून पीकविमा योजनेअंतर्गत भरपाई मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी पीकविमा हप्ते भरले असतानाही तपासणी आणि पंचनामे करण्यात प्रशासनाचा वेग अत्यंत कमी असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, ऑनलाइन अर्ज सादर करूनही विमा कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही.

दिघोरी मोठी, मुर्झा, झरी, मालदा, तावशी परिसरात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी समित्यांनी केली आहे. यावर शासन काय निर्णय घेते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शेतकऱ्यांची मागणी

पीकविम्याचे तत्काळ सर्वेक्षण व पंचनामे करावेत. नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत द्यावी. विमा कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्यास शासनाने थेट हस्तक्षेप करावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासन व प्रशासनाने वेळेत मदत न केल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लोकप्रतिनिधी मात्र या विषयावर मूग गिळून असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Damage, No Insurance! Farmers' Anger Rises Over Delayed Aid.

Web Summary : Untimely rains severely damaged rice crops in Dighori, causing significant losses. Farmers, burdened by financial strain, await crop insurance. Delays in assessment and lack of response from insurance companies fuel resentment. Locals demand immediate government intervention and financial assistance.
टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाfarmingशेतीVidarbhaविदर्भ