शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकाचे नुकसान, मात्र पीकविमा मिळेना ! शेतकऱ्यांचा वाढतोय रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:30 IST

Bhandara : धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले.

दिघोरी मोठी : परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले धानाचे पीक पूर्णपणे आडवे झाले असून, अनेक ठिकाणी धानाला अंकुर आले असून, कणसे काळी पडून कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या कोलमडला असताना पीकविमा मिळण्यात मात्र विलंब होत आहे.

धानाचे पीक कापणीस तयार झालेल्या शेतकऱ्यांनी कापणी केली, तर अनेक शेतकऱ्यांचे धानपीक डौलात उभे होते. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. या ओलाव्यामुळे पीक कुजले, कणसे गळून पडली आणि उत्पादनात मोठी घट येणार आहे.

सरकारकडून पीकविमा योजनेअंतर्गत भरपाई मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी पीकविमा हप्ते भरले असतानाही तपासणी आणि पंचनामे करण्यात प्रशासनाचा वेग अत्यंत कमी असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, ऑनलाइन अर्ज सादर करूनही विमा कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही.

दिघोरी मोठी, मुर्झा, झरी, मालदा, तावशी परिसरात या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी समित्यांनी केली आहे. यावर शासन काय निर्णय घेते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शेतकऱ्यांची मागणी

पीकविम्याचे तत्काळ सर्वेक्षण व पंचनामे करावेत. नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत द्यावी. विमा कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्यास शासनाने थेट हस्तक्षेप करावा. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासन व प्रशासनाने वेळेत मदत न केल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. लोकप्रतिनिधी मात्र या विषयावर मूग गिळून असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Damage, No Insurance! Farmers' Anger Rises Over Delayed Aid.

Web Summary : Untimely rains severely damaged rice crops in Dighori, causing significant losses. Farmers, burdened by financial strain, await crop insurance. Delays in assessment and lack of response from insurance companies fuel resentment. Locals demand immediate government intervention and financial assistance.
टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाfarmingशेतीVidarbhaविदर्भ