अतिपावसाने धानाचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:32+5:30

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग खरीप हंगामामध्ये धान पिकाचे उत्पादन घेत असतो. त्यामध्ये उच्च प्रतीच्या वाणाच्या धानपिकाला अधिक पाण्याची गरज असते. उच्चप्रतीचे धान पीक तीन महिन्यानंतर कापणीसाठी येतील. या धानाच्या उत्पादनासाठी अधिक दिवसांचा कालावधी लागतो तर साधारण प्रतीच्या धानाला कमी दिवसांचा कालावधी लागत असतो.

Overproduction will reduce paddy production | अतिपावसाने धानाचे उत्पादन घटणार

अतिपावसाने धानाचे उत्पादन घटणार

ठळक मुद्देशेतकरी संकटात : साधारण प्रतिचे धान पीक लोंबीवर, पिकांवर अळींचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसल्याने यावर्षी धान पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्यस्थितीत साधारण प्रतिचे धान पीक लोंबीवर असून पावसामुळे सदर पीक धोक्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग खरीप हंगामामध्ये धान पिकाचे उत्पादन घेत असतो. त्यामध्ये उच्च प्रतीच्या वाणाच्या धानपिकाला अधिक पाण्याची गरज असते. उच्चप्रतीचे धान पीक तीन महिन्यानंतर कापणीसाठी येतील. या धानाच्या उत्पादनासाठी अधिक दिवसांचा कालावधी लागतो तर साधारण प्रतीच्या धानाला कमी दिवसांचा कालावधी लागत असतो. सध्यस्थितीत हलक्या प्रतीचे धान पीक लोंबीवर आहेत. मात्र सुरू असलेल्या संततधार पावसाने लोंबीवर आलेला धानाचा फुलोरा पडत आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असून तांदळाची प्रत खराब होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. भंडारा जिल्ह्यात जवळपास एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात शेतकºयांनी धान पिकाची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने रोवणीला उशीर झाला होता. दुबार, तिबार पेरणीनंतर १५ आॅगस्टदरम्यान पावसाने हजेरी लावली. या पावसाने रोवणीला वेग आला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ९५ टक्के रोवणी आटोपली. त्यानंतर मात्र जिल्ह्यात संततधार पावसामुळे धान पीक पाण्याखाली आले आहे. अतिपावसाने धान पिकाची वाढ खुंटली आहे. कीडींचा प्रादुर्भाव वाढल्याने संकट आले आहे.

कीटकनाशके अनुदानावर देण्याची मागणी
धानपिकावर खोडकीडीसह मावाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकºयांच्या समस्येत भर झाली आहे. महागडी कीटकनाशके विकत घेवून शेतकरी पीक वाचविण्यासाठी आटापिटा करीत आहे. महागडी औषध खरेदी करण्याची कुवत अनेक शेतकºयांकडे नसल्याने कर्ज काढून औषधी खरेदी करीत आहेत. कृषी विभागाने कीटकनाशके अनुदानावर मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आहे.

Web Title: Overproduction will reduce paddy production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.