नदीतील विहिरीत केवळ दीड फूट पाणी

By Admin | Updated: April 27, 2016 00:24 IST2016-04-27T00:24:23+5:302016-04-27T00:24:23+5:30

जीवनदायीनी बावनथडी नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले असून गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची नदीपात्रातील विहीर शेवटचीच घटका मोजत आहे.

Only a half feet of water in the well of the river | नदीतील विहिरीत केवळ दीड फूट पाणी

नदीतील विहिरीत केवळ दीड फूट पाणी

वक्रद्वार उघडण्याचा शिवसेनेचा इशारा : बावनथडी नदी कोरडी, १७ हजार नागरिकांना तीव्र पाणी टंचाई
मोहन भोयर  तुमसर
जीवनदायीनी बावनथडी नदीपात्र पूर्णत: कोरडे पडले असून गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची नदीपात्रातील विहीर शेवटचीच घटका मोजत आहे. विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे. सहा गावातील १६ ते १७ हजार नागरिकांना तीव्र पाणी टंचाई भेडसावीत आहे. बावनथडी धरणाची दारे स्वत: उघडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गोबरवाही येथे जिल्हा परिषदेची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेची विहीर बावनथडी नदीपात्रात पाथरी या गावाजवळ आहे. सुमारे २५ वर्षापासून ही योजना यशस्वीपणे सुरु होती. एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाळ्यात बावनथडी नदी पात्र कोरडे पडले. विहिरीचे जलस्त्रोत बंद झाले. सध्या विहिरीत केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे. संपूर्ण मे महिना शिल्लक आहे.
गोबरवाही, राजापूर, चिखला, सीतासावंगी, नाकाडोंगरी, सुंदरटोला या गावात या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. १८५० नळ कनेक्शनधारक आहे. सुमारे १६ ते १७ नागरिकांना यापूर्वी मुबलक पाणी मिळत तरी होते. सध्या ही पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र आहे.

प्रकल्पातून पाणी सोडणे एकमेव पर्याय
प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरु राहावी याकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडणे हा एकमेव पर्याय आहे. परंतु धरणात पाणीसाठा शिल्लक नाही.असे प्रकल्पांचे अभियंते सांगत आहेत. मृत जलसाठा नदीत प्रवाहित करता येत नाही. असा नियम त्यांनी सांगितला.
शिवसेनेचे नेते तथा पंचायत समितीचे उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी बावनथडी प्रकल्पाचे वक्रद्वार शिवसैनिकांसोबत स्वत: उघडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. प्रकल्पात जलसाठा आहे. निदान पिण्याकरिता पाणी सोडावेच लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली.
पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता धनंजय बावनकर व इतर अधिकाऱ्यांनी बावनथडी नदी पात्रातील विहिरींची पाहणी केली. केवळ दीड ते दोन फुट पाणी विहिरीत शिल्लक असल्याचा अहवाल त्यांनी प्रशासनाकडे पाठविला आहे.येथे पाणी पेटण्याची शकयता नाकारता येत नाही.
बावनथडी नदी पात्राशेजारील १० ते १५ गावातील शेतकऱ्यांनी ऊस व इतर भाजीपाला लावला. ऊस पिकांना पाणी नाही. त्यामुळे ते जळण्याच्या स्थितीत आहेत. भाजीपाल्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

बावनथडी धरणातून पाणी प्रशासनाने न सोडल्यास आपण स्वत: शिवसैनिकांसोबत प्रकल्पाचे वक्रद्वार सुरु करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. पाणी समस्या दूर करणे प्रशासनाचे काम आहे.
- शेखर कोतपल्लीवार, उपसभापती, पं.स. पवनी
गोबरवाही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत केवळ दोन फुट पाणी साठा उपलब्ध आहे. मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणारत आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने जलस्त्रोत नाही.
- धनंजय बावनकर, उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग, पं.स. तुमसर

Web Title: Only a half feet of water in the well of the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.