शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शाळा एक, भरते तीन ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:06 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते.

ठळक मुद्देपिलांद्रीची शाळा । चार महिन्यापासून शाळेचे छत नाही

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. शाळा एक असली तरी वर्ग मात्र तीन ठिकाणी भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. वर्गखोलीचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी पिलांद्री येथील पालकांनी केली आहे.पवनी तालुक्यातील पिलांद्री येथील शाळा परिसरात नावाजलेली होती. परंतु १९६६ मध्ये बांधलेली ही शाळा आता जीर्ण झाली आहे. डागडुजीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली. त्यातच चार महिन्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली छत काढण्यात आले. परंतु पावसाळा सुरु झाला तरी छत टाकण्यासाठी मुहूर्त झाला नाही. त्यामुळे शाळा एक असली तरी तीन ठिकाणी भरविली जात आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृहाचाही अभाव आहे. पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी घर गाठावे लागते. १२० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेत ज्ञानार्जन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शाळेत एक संगणक असून या कक्षातही विद्यार्थ्यांना बसविण्याशिवाय पर्याय नाही.या शाळेची इमारत तीन वर्षापासून आहे त्या अवस्थेत आहे. प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. क्रीडांगण नाही. परिपाठासाठी एक खोली आहे. त्या खोलीत १२० विद्यार्थी कसेबसे बसतात. या सर्व प्रकारामुळे विद्याथ् र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जीर्ण झालेल्या शाळेत अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वर्गखोलीचे तात्काळ बांधकाम करावे अशी मागणी सरपंच भारती मडावी व गावकऱ्यांनी केली आहे.अपघाताची भीतीशाळेच्या जीर्ण इमारतीत १२० विद्यार्थी शिकतात. या शाळेचे छत काढून ठेवण्यात आले आहे. इमारतीच्या भींतीही खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची कायम भीती असते. विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत घेऊन येथे ज्ञानार्जन करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन या शाळा इमारतीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.भौतिक सुविधा विषयींचा अहवाल आपण दरवर्षी जिल्हा परिषदेला पाठवितो. दुरुस्तीची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या वतीने शाळांची निवड करून केली जाते.-एन.टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी, पवनी.

टॅग्स :Schoolशाळा