शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वाहनांच्या रांगातून त्रिमूर्ती चौकात शोधावा लागतो मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 17:49 IST

त्रिमूर्ती चौकात मुख्य शासकीय कार्यालये आहेत. येथे सभा, मोर्चा, धरणे आंदोलने होत असतात.

- देवानंद नंदेश्वरभंडारा : शहराची लाेकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या तसेच अन्य गावांतून व शहरांतून रोजगार व कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच महामार्गावर असलेल्या शहरातील अत्यंत वर्दळीचा त्रिमूर्ती चौक अजून किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद चौकात वाहनांचा भरधाव वेग व वाहतूक कर्मचाऱ्याची थोडीशीही चूक जिवावर बेतू शकते. अपघात ही बाब नित्याचीच झाली आहे.

त्रिमूर्ती चौकात मुख्य शासकीय कार्यालये आहेत. येथे सभा, मोर्चा, धरणे आंदोलने होत असतात. येथूनच बसस्थानक व कॉलेज मार्ग आहे. अपघात थांबविण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था उभारलेली दिसत नाही. सिग्नल असूनही ते फक्त शोभेचे ठरले आहे. या धोक्याच्या चौकातून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

शहरातील अत्यंत धोकादायक व वर्दळीच्या चौकात महामार्गावरील जड वाहतुकीमुळे नेहमी अपघात घडत असतात. रस्त्यांच्या कडेला फूटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण आहे. बस व ऑटोचा थांबा आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यातून नेहमीच वाहतूक पोलिसांची दमछाक होते. दोन वाहतूक पोलिस सदैव तैनात असतात. तीन दिवसांपूर्वीच महामार्गाच्या कडेवरील अतिक्रमण काढण्यात आले. परंतु त्यामुळे रस्ता मोठा होणार नाही. रस्त्याच्या कडेला पाच ते सहा दशकांपासूनचे विशालकाय वृक्ष आहेत. नागपूर, पवनी, लाखनी येथून येणारे नागरिक शहरात प्रवेश करताना त्रिमूर्ती चौकातील रस्त्यांचा अधिक वापर करतात.

महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीचत्रिमूर्ती चौकातून ये-जा करताना महामार्ग ओलांडावाच लागतो. मात्र महामार्गाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक काेंडी नित्याची आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची नेहमीच दमछाक होताना दिसून येते. शहराचा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे नेहमी आवागमन असते. मात्र समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना केली जात नाही.ही आहेत अपघातांची कारणे- सायंकाळी शाळा व शासकीय कार्यालय तसेच असंघटित क्षेत्रातील मजूर, कामगारांची सुट्टी झालेली असते.- प्रत्येकजण घाईत असतो. वाहन पुढे दामटण्याच्या नादात हमखास अपघात होतो. वेगावर नियंत्रण नसते.- रात्रीचा अंधार, रस्त्यावरील खड्डे, मद्यपान करून वाहन चालविण्याची सवय.- बेशिस्त वाहतूक, नियमांचे पालन न करणे, हेल्मेट व सीटबेल्ट न बांधणे.- ओव्हरटेक तसेच जड वाहतूकही अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी