शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
5
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
6
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
7
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
8
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
9
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
10
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
15
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
16
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
17
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
18
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
19
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे न करताच परत गेले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत.

ठळक मुद्देव्यथा चौरास भागातील : शेतकऱ्यांचा आरोप, तर मदत कशी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : परतीच्या पावसाने पावणेपाच एकरातील धान पीक मातीमोल झाले. या धानपिकांचा पंचनामा करण्यासाठी तलाठ्याकडे विणवनी करण्यात आली. पण सध्या पंचनामे करणे बंद झाले आहे, असे म्हणून शेतकºयाुा परतवून लावले. दोन लाख २५ हजाराचे धान गेल्याने कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न लिलाबाई येवले (७३) यांना पडला आहे.विशेष म्हणजे पंचनामे न करताच अधिकारी व कर्मचारी परत गेले, असा आरोप चौरास भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.
तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत. अनेक शेतकºयांचे धानाचे पीक परतीच्या पावसाने पुर्णत: गेले. पण कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करीत नाही, असे दिसत आहे.
सेंद्री बु. येथील शेतजमीन पालोरा चौ. तलाठी साझ्यात येते. येथील तलाठी वासनिक यांना लिलाबाई येवले (७३) यांच्यातर्फे मुलगा सुनील येवले यांनी पीक नुकसानीचा फोटो दाखविला. सर्व पीक परतीच्या पावसाने जमिनदोस्त झाले. कापणीला आलेले पीक लोटल्याने कीडीने पुर्णपणे फस्त केले. शंभर टक्के अनुदान झाले. त्यामुळे हवालदिल झाल्याचे त्यांनी सांगितले. सेवासहकारी संस्थेचे पीक कर्ज ६७ हजार रासायनिक खताची उधारी २५ हजार व शेतीसाठी घेतलेले पतसंस्थेचे ५० हजार इतर कर्ज एक लाख ५० हजार रूपये कसे भरावे असा प्रश्न पडला आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर आहे. सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेताना पीक विमा कपात केली म्हणून पीक विमा कंपनीच्या कर्मचाºयास फोन केला त तो देखिल शेतावर येण्यास तयार नाही. ‘सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळेल’, असे गोड बोलून आम्हची बोळवण करीत आहे. शेतातील नुकसान भरपाईचा पंचनामा केला नाही तर पीक विमा मिळेल, शासन आर्थिक मदत कशाच्या आधारे देईल, अशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांची झालेली आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी चौरास भागातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती