शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आता पासशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीसह कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कुणीही घराबाहेर निघू नये, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. महत्वाच्या कामासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर निघण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अनेक जण कोणतेही कारण नसताना रस्त्यावर फिरताना दिसत होते.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंध उपाय : नगरपरिषद देणार प्रत्येक कुटुंबाला घरपोच पास, रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही नागरिक नाहक रस्त्यांवर येवून पोलिसांचा ताण वाढवत आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्गाची अधिक भीती असते. नागरिकांची रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी भंडारा नगरपरिषद प्रत्येक कुटुंबाला पास देणार आहे. निर्धारित दिनांकालाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडता येणार आहे. नगरपरिषद येत्या दोन दिवसात शहरातील प्रत्येक कुटुंबाला ही पास घरपोच देणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीसह कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कुणीही घराबाहेर निघू नये, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. महत्वाच्या कामासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर निघण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अनेक जण कोणतेही कारण नसताना रस्त्यावर फिरताना दिसत होते. पोलिसांनी विचारल्यास कुणी किराणाचे, कुणी औषधीचे तर कुणी भाजीपाल्याचे कारण सांगत होते. हातात पिशवी घेवून दुचाकीवर रपेट मारणाऱ्या टार्गट तरूणांची संख्याही वाढली होती. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवूनही कोणी वढणीवर येत नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला निर्देश देवून ओळखपत्र वितरणाची सूचना दिली.आता भंडारा शहरात घराबाहेर निघण्यासाठी नगरपरिषदेने दिलेली अधिकृत पासच आवश्यक राहणार आहे. सदर पास प्रत्येक कुटुंबाला नगरपरिषदेचे कर्मचारी घरपोच पोहचून देणार आहे. शहरात २५ हजार मालमत्ताधारक असून त्या प्रत्येकाला ती पास दिली जाईल. यासाठी पासेस नगरपरिषदेचे तयार केल्या असून ३० कर्मचारी दोन दिवसात या पासचे प्रत्येकाकडे वितरण करणार आहे. ही पास घेवूनच बाहेर निघता येणार आहे. या पासवर एक दिवसाआढ घराबाहेर निघण्याची राहणार आहे. घरून निघताना बाहेर निघण्याचे कारण त्यावर नमूद करावे लागेल. तसेच दुकानदाराची स्वाक्षरीही या पासवर घ्यावी लागेल. विशेष म्हणजे या पासवर ज्याचे नाव असेल त्याचा फोटो राहणार आहे. तोच व्यक्ती घराच्या बाहेर निघेल. बाहेर तपासणी करताना संबंधिताना त्याला आपले इतर ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. शुक्रवारी या पासचे वितरण शहरातील काही भागात नगरपरिषदेचे अभियंता नागेश कपाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. येत्या दोन दिवसात सर्वांना ही पास वितरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.्रपास देताना महिलांच्या नावांना प्राधान्यजीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर निघताना आता पास सक्तीची करण्यात आली आहे. नगरपरिषद पास वितरीत करताना कुटुंबातील महिलेच्या नावाला प्राधान्य देणार आहे. सदर पासवर पासधारकाचे नाव, कुटुंबातील व्यक्तीची संख्या, पत्ता, छायाचित्र असून त्यावरच एक दिवसा आढची तारीख मुद्रीत करण्यात आलेली आहे. एका कुटुंबाला २८ मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी असेल तर त्याला दुसºया दिवशी घराबाहेर निघता येणार नाही. तर एक दिवस आढ म्हणजे ३० तारेखला घराबाहेर केवळ खरेदीसाठीच निघता येणार आहे. तारखेप्रमाणे बाहेर येणाºयावर कारवाई करणार आहे.सहा ठिकाणी भरणार भाजी बाजारभंडारा शहरात वरठी रोडवरील टाकळी येथील आयटीआयसमोर, शास्त्री चौकातील दसरा मैदान, खात रोडवरील रेल्वे ग्राऊंड, गांधी चौकात छोटा बाजार, पोस्ट ऑफिस चौकात बडा बाजार, राजीव गांधी चौकात गणेश विद्यालय आणि मुस्लिम लायब्ररी चौकात तुरस्कर गार्डनमध्ये भाजीपाला बाजार भरविला जाणार आहे. सामाजिक अंतर ठेवून हा बाजार भरविला जाणार असून नगरपरिषदेचे आखून दिलेल्या ठिकाणीच विक्रेत्यांना आपल्या साहित्याची विक्री करावी लागणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसराच्या जवळील बाजारातूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस