शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

लोकसभा निवडणूक निकालावर संशोधन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:14 AM

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, ......

ठळक मुद्देनाना पटोले : भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, असे मत माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले मागील पाच वर्षात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही सातत्याने वाढत गेले. महागाई गगनाला भिडली तर डॉलरच्या मागे रुपयाची घसरण झाली. लहान व्यापारी बेहाल झाले. गरीबांच्या योजनांवर घाला घालण्यात आला. अशा विपरित स्थितीतही भाजपला बहुमत कसे काय मिळाले हाच आमचा मुख्य प्रश्न आहे. ईव्हीएम बाबत न्यायालयासह निवडणूक विभागाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र गावापासून राज्यापर्यंत संशोधन होणे गरजेचे असून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही नाना पटोले यांनी आवर्जून सांगितले.हारणे व जिंकणे या स्पर्धेतील बाजू असल्या तरी लोकशाही रूजविलेल्या देशात पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. निकालानंतरची परिस्थिती पाहता देशात भीतीचे वातावरण आहे. निकाल हाती आल्यानंतर कुठेही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही. कुठेतरी काही कमी आहे व यावरच लोकांच्या मनातील संशय संशोधनाच्या माध्यमातून समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. येणारी निवडणूक बॅलेट पेपरवरच व्हावी अशी आमची मुख्य मागणी असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९