नवतपा : आग ओकतोय सूर्य
By Admin | Updated: May 24, 2014 23:20 IST2014-05-24T23:20:20+5:302014-05-24T23:20:20+5:30
सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपाला उद्या, २५ मे पासून प्रारंभ होत आहे. त्यापूर्वीच दरवर्षीप्रमाणे आता उन्ह तापू लागले आहे. सलग दुसर्या दिवशी भंडार्यात उष्णतेने फिरणे असह्य केले.

नवतपा : आग ओकतोय सूर्य
पारा भडकला : तापमान ४५.५ अंशावर, रस्ते झाले निर्मनुष्य भंडारा : सूर्याची सर्वाधिक धग असलेल्या नवतपाला उद्या, २५ मे पासून प्रारंभ होत आहे. त्यापूर्वीच दरवर्षीप्रमाणे आता उन्ह तापू लागले आहे. सलग दुसर्या दिवशी भंडार्यात उष्णतेने फिरणे असह्य केले. ही तीव्रता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. यावर्षीच्या हंगामातील उन्हाच्या सर्वाधिक झळा आज शनिवारला जाणवल्या. दरवर्षीच मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पारा उच्चाक गाठतो. मागील आठवड्यात ४0 ते ४२ अंशादरम्यान असलेले तापमान या आठवड्याच्या शेवटी ४५ अंशावर पोहोचले. शनिवारी ४५.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. यावर्षीची ही सर्वाधिक नोंद आहे. उष्णतेत कमालिने वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सुर्य आग ओकु लागला आहे. उष्ण वारे वाहत असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. शहरातील वर्दळ सायंकाळपर्यंत मंदावली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. मागील १२ वर्षांमध्ये सर्वाधिक तापमान सन २00२ मध्ये ४३ अंश, २00३ मध्ये ४२ अंश, २00४ मध्ये ४२ अंश, २00५ मध्ये ४६ अंश, २00६ मध्ये ४२ अंश, २00७ मध्ये ४४.५ अंश, २00८ मध्ये ४२.५ अंश, २00९ मध्ये ४४.५, सन २0१0 मध्ये ४६ अंश, २0११ मध्ये ४६.५ अंश, सन २0१२ मध्ये ४६.५ अंश, सन २0१३ मध्ये ४६ अंश तर यावर्षी दि.२४ मे रोजी ४५.५ अंश तापमान नोंदविण्यात आले. यावर्षीचा उन्हाळा जीवघेणा ठरत दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट आहे. वाहतूक ठप्प होत असून रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे. दुपारी फेरीवाले फिरताना दिसत नाहीत. नागरिकांचीही वर्दळ नाही. दिवसभर कुलरच्या हवेत कामकाज सुरु आहे. बसेसमधील गर्दीही ओसरली आहे. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेच्या बचावासाठी शहरात ठिकठिकाणी रसवंती, शितपेयांची दुकाने थाटलेली आहेत. टरबूज, खरबूज, डांगर, अननस आदींची विक्री वाढली आहे. एप्रिल महिन्यात १0 रूपयांपासून ६0 रूपयांपर्यत टरबुजची किंमत होती. मे महिन्यात त्या किमतीत कमालिने वाढ झालेली आहे. आता ५0 रूपयांपासून १00 रूपयांपर्यत टरबुजची विक्री सुरू आहे. पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कडक उन्हामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. घराबाहेर महत्वाच्या कामानिमित्त पडायचे असेल तर दिवसा छत्री घेऊन जावे लागत आहे. उष्माघाताच्या बचावासाठी खिशात कांदा बाळगण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)