लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने कृष्णराव अर्जुनजी केडूसकर (आर्शिवाद मंगल कार्यालय) साहित्य परिसरात आयोजित १९ वे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. एम. राजन होते. यावेळी अॅड. डॉ. कल्याणकुमार अॅड. रमन श्रीहरी चिमुरकर, स्वागताध्यक्ष भारती दिवटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. विधानपालिका व कार्य पालिका योग्य काम करीत नसल्यास न्याय पालिका समोर येते. नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी न्याय पालिकांनी केलेले प्रयत्न अनेक उदाहरणानी समजावून सांगितले.सामाजिक आणि आर्थिक उद्देशांच्या पुर्तीसाठी नागरिकांनी संविधानिक मार्गानेच लढा द्यावा असे आवाहन केले. यावेळी डॉ. रिता राऊत, डॉ. सुधिर मस्के, डॉ. प्रवीण अबगड, गजेंद्र गजभिये, जी. एस. कान्हेकर, प्रा. वासंती सरदार, सी. एम. बागडे, राजेश तिरपुडे, दिनेश राऊत, सरिता जनबंधू, दोपेश्वर मेश्राम, मेघा आंबुलकर, अजीत वैद्य, नितेशकुमार भैसारे, अश्विन रामटेके, प्यारेलाल लोणारे यांचा स्मृतीचिन्ह, भारताचे संविधान देवून सत्कार करण्यात आला.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात धनंजय मुळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यात संध्या कानेकर, नंदा कुटे, अल्का खोब्रागडे, जयश्री गणवीर, सुप्रिया उके, अस्मिता नंदागवळी, ममता राऊत, भुवनेश्वरी परशुरामकर, दौलतभाई पठाण, अशोक भजने, प्रणय पिल्लेवान, पंकज बावनकुळे, यशवंत सिम्पोलकर, ललीत तिरपुडे या नवोदित कवींनी कविता सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली.तिसºया सत्रात सप्तखंजरीवादक आकाश ताले आणि त्यांच्या संचाने समाजप्रबोधन र्कीतन सादर केले. कीर्तनातून त्यांनी व्यसनानिधता, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, ग्रामस्वच्छता अशा विविध मुद्यांवर जनजागृती केली. संचालन बहुजन विद्यार्थी संघाचे संघटक हितेंद्र रामटेके, आभार प्रदर्शन प्रदीप भावे यांनी केले. संमेलनासाठी बहुजन विद्यार्थी संघ लाखांदूर, नागपूर यांनी सहकार्य केले.
लाखांदूर येथे राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:00 AM
प्रास्ताविक बहूजन प्रबोधन मंचचे अनिल कानेकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. एस. एम. राजन यांनी ‘संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा पुर्तीसाठी न्याय पालिकांचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. विधानपालिका व कार्य पालिका योग्य काम करीत नसल्यास न्याय पालिका समोर येते.
ठळक मुद्देबहुजन प्रबोधन मंचचे आयोजन : मार्गदर्शन, कवी संमेलन, कीर्तनातून जनजागृती, गुणवंताचा गौरव