शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भंडारा जिल्ह्यात कोका अभयारण्यामुळे पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:36 PM

जिल्ह्यात असलेल्या भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्य पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. मागील काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने वनविभागाच्या महसुलात वाढ होत आहे.

ठळक मुद्देडबल सफारीचा आनंद४६ किमीचा सफारीचा मार्ग

आॅनलाईन लोकमतभंडारा : महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा ११ लाखांच्यावर लोकसंख्या आहे. नैसर्गिक सौंदर्यासोबतच, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्या जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्रापैकी १/३ क्षेत्र जंगलाने व्यापलेला आहे. या जिल्ह्यात असलेल्या भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्य पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. मागील काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने वनविभागाच्या महसुलात वाढ होत आहे.भंडारा - गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या १० हजार १३ हेक्टर वनक्षेत्र शासनाने २०१३ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला कोका अभयारण्य असे नाव देण्यात आहे. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला आता अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.अभयारण्यातील प्राणी येथील पर्यटकांसाठी आकर्षक ठरले आहे. यासोबतच येथील निसर्गसानिध्याची भुरळ पर्यटकांना कोका अभयारण्यात वारंवार येण्यासाठी आकर्षित करीत आहे. हे अभयारण्य वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी संरक्षित केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळवीट, निलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुक्कर आदींचा अधिवास आहे. त्याचबरोबर अनेक पक्ष्यांच्या अधिवासाने व जैवविविधतेने येथील निसर्ग सानिध्य नटलेला आहे.या अभयारण्याचा विकास डिसेंबर २०१३ पासून सुुरु झाला. येथे २५ नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाकी तयार करण्यात आली आहे. टाकीत सतत पाणी राहावे म्हणून सौर उर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातीलच १२ वी पास विद्यार्थ्यांना येथील पर्यटकांना गाईड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.अभयारण्यातील डबल सफारीचा मार्ग ४६.५ कि.मी. चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वाढत आहे.अभयारण्यासाठी मार्गनागपूर - भंडारा हे ६५ कि.मी. चे अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार १९ कि.मी. चे आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून तीन जिप्सीची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. या जंगल सफारीची वेळ पहाटे ५ ते सकाळी ९.३० पर्यंत आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६.४५ पर्यंत ठरविण्यात आली आहे.आॅनलाईन बुकींगअभयारण्याला भेट देण्यासाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था आहे. तसेच स्पॉट बुकींग चंद्रपूर प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी पाच ते सात गाड्या सोडण्यात येतात. येथे पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमीटीचे दोन टेंट आहेत. यामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था आहे.