शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

बचत गटांच्या वस्तूविक्रीसाठी मिनी मॉल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:11 IST

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य असून बचत गटांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट निर्मित वस्तुंच्या केंद्रीय विक्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भंडारा येथे मिनी मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉल मधून बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : कृषि महोत्सवाचा समारोप, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य असून बचत गटांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट निर्मित वस्तुंच्या केंद्रीय विक्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भंडारा येथे मिनी मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉल मधून बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले.कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, उमेद प्रकल्प व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ डिसेंबर २०१८ दरम्यान दसरा मैदान शास्त्री चौक, भंडारा येथे वैनगंगा कृषि महोत्सव व सरस महिला बचत गट विक्री प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप बुधवारी झाला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, महिला बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य निळकंठ कायते, कारेमोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा मनिषा कुरसंगे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. सतिश राजु व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शेतकरी व महिला बचत गटांना नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी यासाठी कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, शेतकºयांनी नविन प्रयोगाची माहिती करुन घेवून हे प्रयोग आपल्या शेतीत केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल. या महोत्सवात विविध विभागाच्या योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. या योजनांचा लाभ गरजुंनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.कृषि व बचत गट एकमेकाला पूरक असून कृषि महोत्सवाच्या माध्यमातून दोन्ही वगार्चे सक्षमीकरण व्हावे यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा व कृषि विभागाने एकत्रित हा महोत्सव आयोजित केला होता, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितले. सेंद्रीय तांदुळाला मोठी मागणी या महोत्सवात मिळाली. पशुसंर्वधन विभागाच्या पशु प्रदर्शनीला शेतकºयांनी मोठा प्रतिसाद दिला. बचत गटाच्या उत्पादनांना नागरिकांनी पसंती नोंदविली. त्यामुळे हा महोत्सव शेती व बचत गटांना व्यावसायिक दिशा देणारा ठरला, असे रविंद्र जगताप म्हणाले. महिला सक्षमीकरणाला नवी उभारी या महोत्सवातून मिळेल अशी अपेक्षा रेखा ठाकरे यांनी व्यक्त केली.कृषि महोत्सवात विविध विभागाचे १५० स्टॉल लावण्यात आले होते. दर दिवशी अंदाजे ४ ते ५ हजार लोकांनी महोत्सवाला भेट दिली. या महोत्सवात विविध उत्पादनाची १३ लाखावर विक्री व नोंदणी झाली. विशेषत: महिला बचत गटांच्या खाद्याच्या स्टॉलला मोठया प्रमाणात पसंती मिळाली. पशुसंर्वधन विभागाच्या पशु दालनास शेतकºयांनी मोठया प्रमाणात गर्दी केली विशेषत: गवळावु गाय व कडकनाथ (कोंबडा) आकर्षणाचा विषय ठरले. सेंद्रिय तांदूळ, हळद, गूळ, शेती उपयोगी अवजारे या महोत्सवात आकर्षण होते. नेपेर गवताचे पाच हजार ठोंब शेतकºयांनी विकत घेतले.यावेळी प्रयोगशिल शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र साकोली, आरोग्य विभाग, शेतकरी उत्पादक कंपन्या, निविष्ठा विभाग, पशुसंवर्धन, महिला बचत गट, शेतकरी गट, फळबाग व भाजीपाला लागवड, औषधी वनस्पती लागवड, ठिबक सिंचन व सेंद्रिय शेती आदिंचा यात समावेश आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण व प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा मनिषा कुरसंगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदुराव चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंजुषा ठवकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे व मूकुंद ठवकर यांनी केले. यावेळी शेतकरी व महिला बचत गटाचे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.