कोट्यवधींचे चुकारे अडले

By Admin | Updated: January 24, 2015 22:49 IST2015-01-24T22:49:16+5:302015-01-24T22:49:16+5:30

आधारभूत धान खरेदी केंद्राला धान विक्री केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना येरझाऱ्या घालाव्या लागत आहे. सात दिवसाच्या आत चुकारे देण्याची शासनाचे नियम आहे.

Millions of croaches are stuck | कोट्यवधींचे चुकारे अडले

कोट्यवधींचे चुकारे अडले

साकोली : आधारभूत धान खरेदी केंद्राला धान विक्री केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना येरझाऱ्या घालाव्या लागत आहे. सात दिवसाच्या आत चुकारे देण्याची शासनाचे नियम आहे. मात्र या नियमांना बगल देत कोट्यवधी रूपयाचे चुकारे थकीत असल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
आॅपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन व सबएजंट असलेल्या श्रीराम भात गिरणीमधील आधारभूत धान खरेदी केंद्राने परिसरातील शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली. या केंद्रावर शेतकऱ्यांनी धान दिल्यानंतर सात दिवसात शेतकऱ्यांना चुकारे मिळायला पाहिजे, असा नियम आहे. मात्र किचकड पद्धतीमध्ये दुसऱ्याला विलंब होतो. यात बदल करणे गरजेचे आहे.
श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली केंद्रावर १६ जानेवारीपर्यंत २३ हजार ९७९ क्विंटल व विर्शी केंद्रावर १४ हजार ३१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. तर २० डिसेंबरपर्यंत साकोली केंद्रावर २ कोटी ३२ लाख १७ हजार रूपये, विर्शी केंद्रावर १ कोटी १९ लाख ३७ हजार रूपयाचे धान खरेदी करण्यात आले.
यापैकी साकोली केंद्रावर ९३ लाख ९२ हजार ८४० रूपये, विर्शी केंद्रावर ७५ लाख ३३ हजार रूपयाचे धानाचे चुकारे बाकी आहेत. श्रीराम भात गिरणी व्यवस्थापनाच्या वतीने २२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०१४ व एक, पाच, दहा व चौदा जानेवारीला बँकेत देण्यात आल्या.
एक महिन्याचा कालावधी लोटूनही दिलेल्या हुंड्या मार्गी लागल्या नाही. चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या येरझारा चालू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Millions of croaches are stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.