शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंगतीत कढी संपली सांगणे तरुणाला महागात पडले, वाढपींंनी बदडून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 16:43 IST

लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भाेजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाढणाऱ्या मुलांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देटेकेपारची घटनागुन्हा दाखल

भंडारा : लग्नात कढी असायलाच हवी.. असा जणू अखिलित नियमच आहे. कढी लोकांच्या इतकी जिव्हाळ्याची आहे की तिला काही ठिकाणी सुंदरीही म्हणतात. मात्र, या कढीप्रेमापायी लग्नसमारंभात हाणामारी झाली व प्रकरण चक्क ठाण्यापर्यंत पोहोचले.

लग्न मंडप पूजन कार्यक्रमाच्या पंगतीत भाेजन करताना कढी संपल्याचे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. वाढणाऱ्या मुलांनी वाद घालून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्परांविरुद्ध कारधा ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

आशिष रवींद्र वंजारी (२६, रा. टेकेपार पुर्नवसन ता. भंडारा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ताे रविवारी आपले चुलत काका अशाेक वंजारी यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात गेला हाेता. मंडप पूजनाच्या पंगतीत ताे जेवण करायला बसला. त्यावेळी त्याने वाढणाऱ्या मुलांना कढी संपली असे सांगितले. त्यावरून एवढ्या जाेराने कशाला ओरडताे असे म्हणत कार्तिक तेजराम वंजारी याने वाद घातला. मी म्हणणार.. कशी संपली कढी म्हणत त्यांच्यात जुंपली. या वादात कार्तिक व त्याचे वडील तेजराम गाेविंदा वंजारी या दाेघांनी काठीने आशिषला चांगलीच मारहाण केली.

याप्रकरणी कारधा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार साठवणे करीत आहे. तर याचप्रकरणी स्नेहा कार्तिक वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष वंजारी याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार साठवणे करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिसbhandara-acभंडारा