शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Lok Sabha Election 2019; पावणेसहा लाख मतदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:26 IST

लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशहरी मतदारात उदासीनता : २,७८५२३ पुरूष आणि २,९५३१३ महिला मतदानाला गेल्याच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे.भंडारा-गोंदिया मतदार संघात १८ लाख आठ हजार ७३४ मतदार आहे. मतदान सक्तीचे नसले तरी सर्वांनी मतदान करावे, अशी अपेक्षा आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबविली. परंतु प्रत्यक्षात ६८.२७ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला.या मतदार संघातील नऊ लाख पाच हजार २७२ पुरूष मतदारांपैकी सहा लाख २६ हजार ७४९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल दोन लाख ७८ हजार ५२३ मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाही तर नऊ लाख तीन हजार ४६० महिला मतदारांपैकी सहा लाख आठ हजार १४७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बत दोन लाख ९५ हजार ३१३ महिला मतदार मतदानासाठी आल्याच नाहीत.विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान बघितल्यास शहरी मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भंडारा शहरातील एक लाख २५ हजार ९१४ आणि गोंदिया शहरातील एक लाख १३ हजार ७५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली.तुमसर विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ३४, साकोली विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ७०५, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील ७२ हजार २६८, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८३ हजार ८४२ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.मतदानासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबविली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहचविण्यात आली. त्यानंतर अनेकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच नाही. शोसल मिडियावरूनही व्यापक जनजागृतीचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.मतदान टाळण्याची अनेक कारणेमतदानाला का गेले नाही, असा थेट प्रश्न विचारला असता अनेकांनी प्रचंड ऊन होते. उन्हात मतदानात जायचे कसे, असा उलट सवाल केला. कोणी निवडूण आला तरी काय फरक पडतो, असे सांगणारेही महाभाग दिसून आले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे आणि मतदार यादीत नावच सापडले नाही, असे सांगणारेही मतदार आहेत. मतदान टाळण्याचे कारणे सांगून लोकशाहीच्या उत्सवात ही मंडळी सहभागी झाली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019