शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

आयुष्य घर बांधण्यात अन् संसार सावरण्यात गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

भंडारा : महापूर, किड्यांचा प्रादुर्भाव, आयुध निर्माणी आणि आता गोसे प्रकल्पामुळे आमचे चौथ्यांदा पुनर्वसन होत आहे. अख्खे आयुष्य घर ...

भंडारा : महापूर, किड्यांचा प्रादुर्भाव, आयुध निर्माणी आणि आता गोसे प्रकल्पामुळे आमचे चौथ्यांदा पुनर्वसन होत आहे. अख्खे आयुष्य घर बांधण्यात आणि संसार सावरण्यातच गेले. आता शहापूर मार्गाजवळ पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. मोबदल्यापासून २२ वर्षानंतर प्लाॅट मिळाला. या २२ वर्षात शासनाच्या प्रत्येक योजनेपासून आम्ही वंचित राहिलो, असे सालेबर्डी पांधीचे नागरिक सांगतात.

भंडारा तालुक्यात सालेबर्डी पांधी गाव आहे. १९९४ साली गोसे खुर्द प्रकल्प घोषित झाला. १९९८ ला पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली. अद्यापही या गावचे पुर्णत: पुनर्वसन झाले नाही; मात्र अभिशाप असल्याप्रमाणे गावाला वारंवार पुनर्वसीत व्हावे लागते. सालेबर्डी पांधी गावाला १९४२ ला महापुराचा फटका बसला. त्यामुळे गाव सोडले. त्यानंतर रिठ मारोतीजवळ गाव वसविण्यात आले; परंतु लहान बाळाचा किड्यांमुळे प्राण गेला. त्यानंतर गावाचे पुन्हा स्थलांतरण झाले; परंतु आयुध निर्माणीमुळे पुन्हा पुनर्वसन झाले. सध्या जेथे सालेबर्डी पांधी गाव आहे, ते आता गोसे प्रकल्पामुळे विस्थापित होत आहे. एखाद्या गावाला वारंवार विस्थापित व्हावे लागत असेल तर तेथील नागरिकांची काय स्थिती असेल, याचा विचार न केलेला बरा.

बाॅक्स

मोबदल्याच्या २२ वर्षानंतर प्लाॅट

सालेबर्डी पांधी गावाचे पुनर्वसन शहापूर-मारेगाव जवळ करण्याचा शासनाने निर्णय घेतला. २००८ साली मोबदला देण्यात आला. सरासरी एक लाखापासून दोन लाखापर्यंत मोबदला मिळाला; परंतु रोख रक्कम हाती असली तरी प्लाॅट मिळाले नाही. दरम्यानच्या २२ वर्षात पैसा खर्च झाला. आता प्लाॅट मिळाला तरी कुणाजवळ घर बांधायला पैसेच राहिले नाही.

बाॅक्स

मोबदला एकरी साठ हजार, शेतीचे दर झाले दहा लाख

गोसे प्रकल्पात सालेबर्डी पांधी येथील अनेकांची शेती गेली. शासनाने २००८ साली सरासरी एकरी ६० हजार रुपये दराने मोबदला दिला. आता कुठेही शेती घेतो म्हटले तरी १० लाख रुपये दर आहे. आजच्या बाजारभावात शेती घेणे कठीण आहे. त्यामुळे वाढीव मोबदला देण्याची मागणी होत आहे.

बाॅक्स

तोपर्यंत वीज कापू नये

गावाचे पूर्णत: पुनर्वसन होत नाही, त्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावातील वीज पुरवठा खंडित करू नये. वीज बिल माफ करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

कोट

शासनाने आखून दिलेल्या ले-आउटमध्ये योग्य नियोजन नाही. नागरी सुविधा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे गावातील २५३ पैकी केवळ ३० कुटुंबच नवीन ठिकाणी राहावयास गेले. या प्रकल्पाने दहा-बारा व्यक्ती सोडले तर सर्वच भूमिहीन झाले. ८० वर्षात चारदा विस्थापित होणाऱ्या या गावाला विशेष बाब म्हणून मदत व्हावी एवढी अपेक्षा.

नजीर बांते, सामाजिक कार्यकर्ता.