शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य घर बांधण्यात अन् संसार सावरण्यात गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:32 IST

भंडारा : महापूर, किड्यांचा प्रादुर्भाव, आयुध निर्माणी आणि आता गोसे प्रकल्पामुळे आमचे चौथ्यांदा पुनर्वसन होत आहे. अख्खे आयुष्य घर ...

भंडारा : महापूर, किड्यांचा प्रादुर्भाव, आयुध निर्माणी आणि आता गोसे प्रकल्पामुळे आमचे चौथ्यांदा पुनर्वसन होत आहे. अख्खे आयुष्य घर बांधण्यात आणि संसार सावरण्यातच गेले. आता शहापूर मार्गाजवळ पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. मोबदल्यापासून २२ वर्षानंतर प्लाॅट मिळाला. या २२ वर्षात शासनाच्या प्रत्येक योजनेपासून आम्ही वंचित राहिलो, असे सालेबर्डी पांधीचे नागरिक सांगतात.

भंडारा तालुक्यात सालेबर्डी पांधी गाव आहे. १९९४ साली गोसे खुर्द प्रकल्प घोषित झाला. १९९८ ला पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली. अद्यापही या गावचे पुर्णत: पुनर्वसन झाले नाही; मात्र अभिशाप असल्याप्रमाणे गावाला वारंवार पुनर्वसीत व्हावे लागते. सालेबर्डी पांधी गावाला १९४२ ला महापुराचा फटका बसला. त्यामुळे गाव सोडले. त्यानंतर रिठ मारोतीजवळ गाव वसविण्यात आले; परंतु लहान बाळाचा किड्यांमुळे प्राण गेला. त्यानंतर गावाचे पुन्हा स्थलांतरण झाले; परंतु आयुध निर्माणीमुळे पुन्हा पुनर्वसन झाले. सध्या जेथे सालेबर्डी पांधी गाव आहे, ते आता गोसे प्रकल्पामुळे विस्थापित होत आहे. एखाद्या गावाला वारंवार विस्थापित व्हावे लागत असेल तर तेथील नागरिकांची काय स्थिती असेल, याचा विचार न केलेला बरा.

बाॅक्स

मोबदल्याच्या २२ वर्षानंतर प्लाॅट

सालेबर्डी पांधी गावाचे पुनर्वसन शहापूर-मारेगाव जवळ करण्याचा शासनाने निर्णय घेतला. २००८ साली मोबदला देण्यात आला. सरासरी एक लाखापासून दोन लाखापर्यंत मोबदला मिळाला; परंतु रोख रक्कम हाती असली तरी प्लाॅट मिळाले नाही. दरम्यानच्या २२ वर्षात पैसा खर्च झाला. आता प्लाॅट मिळाला तरी कुणाजवळ घर बांधायला पैसेच राहिले नाही.

बाॅक्स

मोबदला एकरी साठ हजार, शेतीचे दर झाले दहा लाख

गोसे प्रकल्पात सालेबर्डी पांधी येथील अनेकांची शेती गेली. शासनाने २००८ साली सरासरी एकरी ६० हजार रुपये दराने मोबदला दिला. आता कुठेही शेती घेतो म्हटले तरी १० लाख रुपये दर आहे. आजच्या बाजारभावात शेती घेणे कठीण आहे. त्यामुळे वाढीव मोबदला देण्याची मागणी होत आहे.

बाॅक्स

तोपर्यंत वीज कापू नये

गावाचे पूर्णत: पुनर्वसन होत नाही, त्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावातील वीज पुरवठा खंडित करू नये. वीज बिल माफ करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

कोट

शासनाने आखून दिलेल्या ले-आउटमध्ये योग्य नियोजन नाही. नागरी सुविधा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे गावातील २५३ पैकी केवळ ३० कुटुंबच नवीन ठिकाणी राहावयास गेले. या प्रकल्पाने दहा-बारा व्यक्ती सोडले तर सर्वच भूमिहीन झाले. ८० वर्षात चारदा विस्थापित होणाऱ्या या गावाला विशेष बाब म्हणून मदत व्हावी एवढी अपेक्षा.

नजीर बांते, सामाजिक कार्यकर्ता.