शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू रामाच्या जीवनात पशू-पक्षांचेही महान योगदान

By admin | Updated: August 30, 2016 00:23 IST

प्रभू रामचंद्राच्या जीवनात पशू व पक्ष्यांचेही महान योगदान आहे. जटायु व संपाती ह्यांनी सीता-मातेसाठी रावणासोबत केलेला संघर्ष ही फार मोठी घटना आहे.

चांदवासकर यांचे प्रतिपादन : श्रीराम मंदिरात रामायणावर चर्चासत्रजवाहरनगर : प्रभू रामचंद्राच्या जीवनात पशू व पक्ष्यांचेही महान योगदान आहे. जटायु व संपाती ह्यांनी सीता-मातेसाठी रावणासोबत केलेला संघर्ष ही फार मोठी घटना आहे. राम व लक्ष्मणाची सर्पबंधनातून सुटकाही गरुडाने केली. रामभक्त हनुमान, राजा सुग्रीव अंगद ह्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन हेमंत चंदनवासकर यांनी केले. अस्वल जांबुवंतामुळेच समुद्रसेतु बांधता आला. त्या चिमुकल्या खारोटीचे योगदान फार मनोरंजक आहे. सुवर्णमृगामुळेच सीताहरण झाले. व अश्वमेघ यज्ञामुळे लवकुश यांचे युध्द झाले. मावन जीवनात पशु व पक्षी ह्याचे अनन्य साधारण महत्व आहे. असे अत्यंत माहितीपूर्ण भाषण हेमंत चंदवासकर यांनी श्रीराम मंदिर जवाहरनगर येथे दिले. ते श्रीराम मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित तुळशीवक्ता म्हणून संबोधन करीत होते. ज्यांनी रामायणातील अनेक उपेक्षित प्रसंगाची चर्चा करुन रसिक श्रोत्यांचे मनोरंजन केले.प्रारंभी हेमंत व विवेक पाठक, दिनेश वसाणी व डॉ. गुप्ता ह्यांनी राम दरबार व गोस्वामी तुलसीदास ह्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. रामायण मंडळाच्या ह्या ४९ व्या कार्यक्रमास अध्यक्ष तुकाराम शाहू ह्यांनी सुमधूर स्वरात तुलसी-वंदना गाऊन भावपूर्ण सुरुवात केली. संस्थापक डॉ. गुप्ता ह्यांनी दोन्ही वक्त्यांच्या परिचय करुन दिला.अध्यक्ष दिनेश वसाणी ह्यांच्या हस्ते मराठी संशोधनात्मक पुस्तक ‘मुलारंभ’ चे लेखक वसंत चन्ने ह्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टचे सचिव विवेक पाठक यांनी रामायणाच्या संदर्भात धार्मिक व नैतिक मूल्यांचे महत्व ह्या विषयावर हिंदीत सारगर्भीत भाषण दिले. त्यांनीरामाची मर्यादा, लक्ष्मणाचे व भरताचे बंधुप्रेम, हनुमंताची स्वामीभक्ती व शबरीचे निश्चल प्रेम ह्यांचा उल्लेख करुन उपस्थितांना आवाहन केले. ते म्हणाले आजच्या कलीयुगात ह्या उच्च मूल्यांचा अंगिकार करुनच आम्ही आदर्श समाजाची स्थापना करु शकतो. ज्येष्ठ नागरिक संघ जवाहरनगरचे अध्यक्ष दिनेश वसाणी ह्यांनी दोन्ही वक्त्यांचे सुंदर विचारासांठी हार्दिक आभार मानले.सर्व उपस्थितांना आवाहन केले कि कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी घरी सर्वांनी सामुहिक रामायण पाठ करुन कुटूंबाची संस्कृती जपावी.श्रीराम रामायण मंडळाचे संस्थापक डॉ. चंद्रमोहन गुप्ता ह्यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व घोषणा केली की, पुढील वर्षी कार्यक्रमाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त तीन दिवसांचा भव्य सोहळा संपन्न करण्यात येईल. सुशिल देशमुख यांनी मंडळाचे अहवाल वाचन केले व सचिव वसंत देशमुख ह्यानी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी जवाहरनगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजन गायक गणेशप्रसाद ठाकुर व पं. श्यामकांत जोशी ह्यांनी आरती केली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरणाने करण्यात आली. (वार्ताहर)