शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जीवनदायिनी चुलबंद नदीचे पात्र पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:51 AM

तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष । वीटभट्टी, टरबुज लागवड व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील चुलबंद ही प्रमुख नदी आहे . लाखांदूर तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ही चुलबंदला ओळखले जाते. कारण पाण्यासाठी जास्तीत जास्त गावे या नदीवरच अवलंबून आहेत. पावसाळ्यात या नदीला भरपूर पूर असतो मात्र आजघडीला ती स्वत: तहानलेली आहे.या नदीच्या काठावर तालुक्यातील चप्राड, असोला, भागडी, चिचोली, मांढळ, दांडेगाव, धमार्पुरी, कुंभली यांसारखी अनेक गावे आहेत. ही गावे नदीतील पाण्यावरच पिण्याच्या पाण्यासाठी, वापरासाठी, जनावरांसाठी तसेच सिंचनासाठी अवलंबून आहेत.या वर्षी पडलेला अपुरा पाऊस व प्रशासनामार्फत पाण्याचे नियोजन न केल्यामुळे ही नदी स्वत: तहानलेली आहे. नदी काठावरील मासेमारी बांधवांच्या व्यवसायावर कुºहाड चालली आहे. उन्हाळ्यात नदी पात्रात तरबूज यांची लागवड पाण्याअभावी कोलमडून पडली आहे तर विटा व्यवसाय थंड बस्त्यात आहे.या गावाच्या जवळील छोटी-मोठी खेडे सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठावरील गावावरच अवलंबून आहेत. मात्र नदीच तहानलेली असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.तालुक्यातील मडेघाट या गावात पिण्याचे पाणी लाखांदूर वरून येते मात्र लाखांदूरातच पाण्याची समस्या निर्माण झाल्याने मडेघाटचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मडेघाटातील लोक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत. अशीच समस्या तालुक्यातील अनेक गावांत दिसून येत आहे मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.नदीपात्रातील पाणी कमी असल्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे .त्यामुळे हातपंप , विहिरी यांना पाणी दिसेनासा झालाय. मात्र चुलबंद नदी पात्राच्या जवळच भंडारा जिल्ह्यात इंदिरासागर प्रकल्प तर गोंदिया जिल्ह्यात ईटीयाडोह या प्रकल्पांत भरपूर जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्पांपासून लाखांदूर तालुक्यात कालवे काढले आहेत. मात्र अद्यापही तिथून पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. जर या कालव्यांद्वारे चुलबंद नदीपात्रात पाणी आणले तर वाटेतील गावांची पाण्याची समस्या सुटू शकेल व चुलबंद नदीची सुद्धा तहान भागू शकेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.टँकरमुक्त जिल्हाभंडारा जिल्हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून नोंद आहे. मात्र आजही जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मग टँकरमुक्त जिल्हा म्हणावे तरी कशाला, असा सवाल आपसुकच निर्माण होतो. सिंचन व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना त्रास तर होतोच शिवाय शुद्ध पाण्यासाठीही नागरिकांना भटकावे लागत आहे.पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. जिल्ह्यातील चुलबंद, सुर नदीचे पात्र दरवर्षी कोरडे पडले. तीन ते चार महिने पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होते. या दोन्ही उपनद्यांवर यथोचित ठिकाणी बंधारे बांधणे गरजचे आहे.-मो.सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञ, भंडारा

टॅग्स :water shortageपाणीटंचाईriverनदी