शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

स्वातंत्र्यदिनी घरावर तिरंगा फडकवण्याआधी नियमही माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:58 IST

ध्वजसंहितेचे पालन बंधनकारक : प्लास्टिकचा तिरंगा नकोच, ...तर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय ध्वज संहिता, २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१अंतर्गत राष्ट्रध्वजाच्या वापरासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

तिरंगा नेहमी सन्मानजनक स्थितीत असावा. तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. त्याचा रंग फिका पडलेला नसावा. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्लास्टिकच्या झेंड्यांचा वापर करण्यास मनाई आहे. केवळ कापडी झेंड्याचा वापर करावा. तिरंगा अशा प्रकारे लावावा की, तो कधीही जमिनीला, पाण्याला किंवा रस्त्याला स्पर्श करणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न झाल्यास कारवाई होत असते.

वाहनावर झेंडा योग्य जागा कोणती ? लावण्याचीगाडीवर तिरंगा लावण्यासाठी एक निश्चित जागा आहे. तो गाडीच्या बोनेटवर मध्यभागी किंवा गाडीच्या पुढील उजव्या बाजूला (ड्रायव्हरच्या बाजूला) एका दांड्यावर लावावा. इतर कोणत्याही ठिकाणी, जसे की गाडीच्या मागे, खाली किंवा छतावर अशास्त्रीय पद्धतीने लावणे चुकीचे आहे. चुकीच्या पद्धतीने झेंडा लावल्यास कारवाई केली जाते.

सामान्यांच्या वाहनासाठी काय नियम आहे?कायद्यानुसार, सामान्य नागरिकांना आपल्या खासगी वाहनांच्या बोनेटवर किंवा छतावर तिरंगा लावणे हे नियमांचे उल्लंघन ठरू शकते. तथापि, देशप्रेमाच्या भावनेचा आदर करत, लोक आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर छोटा तिरंगा आदराने ठेवतात. जोपर्यंत त्याचा अपमान होत नाही, तोपर्यंत सहसा यावर कुणाकडून हरकत घेतली जात नाही.

सजावटीसाठी वापर नकोतिरंगाचा वापर कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी, जाहिरातीसाठी किंवा गणवेशाचा भाग म्हणून करता येत नाही, असे झाल्यास तातडीने कारवाई होते. 

गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार कोणाला आहे?भारतीय ध्वज संहितेनुसार, काही विशिष्ट आणि सन्माननीय व्यक्तींनाच त्यांच्या अधिकृत वाहनांवर तिरंगा लावण्याची परवानगी आहे. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, नायब राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांचा समावेश आहे.

रात्री पुरेसा प्रकाश असावातुम्हाला रात्रीच्या वेळीही गाडीवर तिरंगा ठेवायचा असेल, तर त्यावर पुरेशी प्रकाशयोजना असणे बंधनकारक आहे. जेणेकरून तिरंगा स्पष्ट दिसेल.

टॅग्स :bhandara-acभंडाराIndependence Dayस्वातंत्र्य दिन