शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

सरपंच मानधनातून कन्यारत्न पुस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:08 IST

भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.

ठळक मुद्देकरडी येथे ग्रामसभेत गौरव : भाऊबीज भेटीने व सत्काराने भारावल्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांनी मागील वर्षीपासून त्यांना मिळणाऱ्या सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.या गौरवाने महिला भारावल्या. आपल्या सरपंच भावाची भेट आमच्यासाठी अनमोल असल्याचा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांना मागील वर्षी त्यांना मिळणाºया सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्याची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सरपंच महेंद्र शेंडे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते १ जानेवारी २०१९ पासून जन्मास आलेल्या मुलींच्या मातेला कन्यारत्न पुरस्कार, तर जिल्हा परिषद कनिष्ठ कला तथा कला व वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग १० व १२ वी आर्टस, कॉमर्स व विज्ञान शाखेतून प्रथम व द्वितीय आलेल्या प्रतिभावंतास नगदी रक्कम व प्रशस्तीपत्राचे वितरण केले. भाऊबिजेच्या दिवशी आयोजित ग्रामसभेत साडी चोळी व पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याने अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला.यावेळी उपसरपंच गौरीशंकर सिंदपुरे, मंगेश साठवणे, माधुरी इलमे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वामन राऊत, भाष्कर गाढवे, हेमंत भडके, अजय तितिरमारे, अमोल डोहळे, वैशाली सेलोकर, ज्योती साठवणे, अनुप्रिया सार्वे, हर्षा तितिरमारे, जयश्री शहारे, सुश्मा नारनवरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने महिला व पुरूष मंडळी उपस्थित होती. यावेळी सरपंच महेंद्र शेंडे म्हणाले, उपसरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य तर सध्या थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून गावाचा काम काज सांभाळीत आहे.अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण संरक्षणासाठी कार्य केलीत. सरपंचांना फार मोठे मानधन मिळत नसले तरी मिळणारे मानधन हे लोकांचे आहे. त्याचा वापर लोकांसाठी केला पाहिजे या भावनेतूनच कन्यारत्न पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची घोषणा केली. जनकल्याण हेच माझे कल्याण असल्याची भावना त्यांनी पुरस्काराचे वितरण करताना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक