शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

सरपंच मानधनातून कन्यारत्न पुस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:08 IST

भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.

ठळक मुद्देकरडी येथे ग्रामसभेत गौरव : भाऊबीज भेटीने व सत्काराने भारावल्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांनी मागील वर्षीपासून त्यांना मिळणाऱ्या सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची सुरूवात केली. त्याचाच भाग म्हणून भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत त्यांनी वर्षभरात कन्यारत्न जन्माला घातलेल्या महिलांना साडी-चोळीची भेट दिली. मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. तसेच वर्ग १० ते १२ वीत प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा थेट रक्कम देऊन गौरव केला.या गौरवाने महिला भारावल्या. आपल्या सरपंच भावाची भेट आमच्यासाठी अनमोल असल्याचा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या. करडीचे सरपंच महेंद्र शेंडे यांना मागील वर्षी त्यांना मिळणाºया सरपंच मानधनातून कन्यारत्न व गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्याची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून यावर्षी सरपंच महेंद्र शेंडे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते १ जानेवारी २०१९ पासून जन्मास आलेल्या मुलींच्या मातेला कन्यारत्न पुरस्कार, तर जिल्हा परिषद कनिष्ठ कला तथा कला व वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग १० व १२ वी आर्टस, कॉमर्स व विज्ञान शाखेतून प्रथम व द्वितीय आलेल्या प्रतिभावंतास नगदी रक्कम व प्रशस्तीपत्राचे वितरण केले. भाऊबिजेच्या दिवशी आयोजित ग्रामसभेत साडी चोळी व पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याने अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला.यावेळी उपसरपंच गौरीशंकर सिंदपुरे, मंगेश साठवणे, माधुरी इलमे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष वामन राऊत, भाष्कर गाढवे, हेमंत भडके, अजय तितिरमारे, अमोल डोहळे, वैशाली सेलोकर, ज्योती साठवणे, अनुप्रिया सार्वे, हर्षा तितिरमारे, जयश्री शहारे, सुश्मा नारनवरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने महिला व पुरूष मंडळी उपस्थित होती. यावेळी सरपंच महेंद्र शेंडे म्हणाले, उपसरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य तर सध्या थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून गावाचा काम काज सांभाळीत आहे.अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, जनजागृती कार्यक्रम, पर्यावरण संरक्षणासाठी कार्य केलीत. सरपंचांना फार मोठे मानधन मिळत नसले तरी मिळणारे मानधन हे लोकांचे आहे. त्याचा वापर लोकांसाठी केला पाहिजे या भावनेतूनच कन्यारत्न पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्काराची घोषणा केली. जनकल्याण हेच माझे कल्याण असल्याची भावना त्यांनी पुरस्काराचे वितरण करताना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Socialसामाजिक