वीराच्या रक्ताक्षरी अभियानात सहभागी व्हा
By Admin | Updated: May 1, 2017 00:27 IST2017-05-01T00:27:55+5:302017-05-01T00:27:55+5:30
१ मे १९६० ला विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला आणि त्याच दिवसापासून सुजलाम सुफलाम विदर्भाच्या लयाचा सुरुवात झाली.

वीराच्या रक्ताक्षरी अभियानात सहभागी व्हा
सरिता निंबार्ते यांचे आवाहन : १ मे रोजी पाळणार काळा दिवस, एक महिन्यांचा कालावधी
भंडारा : १ मे १९६० ला विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला आणि त्याच दिवसापासून सुजलाम सुफलाम विदर्भाच्या लयाचा सुरुवात झाली. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढून विदर्भाचा बॅकलाँग दिवसेंदिवस वाढतच गेला. राजकीय पक्षांनी वेगळया विदर्भाच्या मुद्द्यावर येथील जनतेची नेहमीच फसवणूक करुन सत्ता काबीज केली. विदर्भाच्या मागणीसाठी आमगाव ते खामगाव पदयात्रा काढणारी भाजपाई सुध्दा काँग्रेस प्रमाणे केवळ आश्वासन देवून विदर्भ मागणीला सत्तेत येताच विसरुन गेले. आता वेगळया विदर्भाची मागणी विदर्भातील जनतेची असून ती सरकार पुढे विविध पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न होत आहे. १ मे पासूनच विदर्भाची उतराती कळा लागली आणि म्हणून हा दिवस विदर्भ राज्य आघाडी काळा दिवस म्हणून दरवर्षी पाळत आली. या वर्षी सुध्दा या काळया दिवसाला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे म्हणून भंडारा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात व मोठया खेडयात विदर्भाचा ध्वज फडकवून काळा दिवस पाळण्यात येईल. तसेच १ मे पासून वीराचा रक्ताक्षरी अभियान सुरु होत आहे या अभियानात अधिकाधिक विदर्भप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते यांनी केले आहे. भंडारा शहरात स्थानिक त्रिमुर्ती चौकात सकाळी ९ वाजता विदर्भाचा ध्वज फडकविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष एॅड. पद्याकर टेम्भूर्णीकर यांनी सांगितले.
१ मे काळया दिवसापासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मे पर्यंत वीरा रक्ताक्षरी अभियान राबवत असून वेगळया विदर्भाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावकऱ्यांनी दिलेल्या नोंदवहित रक्ताचा स्वाक्षरी करून आपला वेगळया विदर्भाची मागणी करावी आणि महिलांचा त्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन सरिता निंबार्ते यांनी यावेळी केले.
भंडारा येथे पार पडलेल्या बैठकीला प्रदेश सचिव राकेश भास्कर, पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते, जिल्हाध्यक्ष अॅड. पद्याकर टेम्भुर्णीकर, रमाकांत पशीने, शब्बीर पठाण, दीपक जांभुळकर, अनिवाश पनके, केशव हूड, सचिन बांडेबूचे, मनोज इरले, अजय मेश्राम, प्रा. वडेटावार, संतोष लांजेवार, सोमनाथ खांडे, अमित टिचकुले, वृंदा गायधने, निहार बुलबुले, विलास शेंडे, माधव फसाटे, देवदास गभने, मंगेश उके, नितीन अंबादे, विजय मेश्राम, बबलू मुनीश्वर व इतर विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)