शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:54 IST

राज्यात पिक वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाई सदृश्यस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायकांसह १२० प्रशिक्षणार्थी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात पिक वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाई सदृश्यस्थिती निर्माण होवून त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील चार दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरुन पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारणातंर्गत उपाययोजना एकात्मिक पध्दतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करुन राबविल्यास पिण्याचे पाणी व संरक्षित देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल, यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय भंडारा व पवनी, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या सयुंक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१८-२०१९ अंतर्गत भंडारा व पवनी तालुक्यातील ४० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधी करिता आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमापं्रसगी ते बोलत होते.जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात गाव पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचे एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड़ संजीव गजभिये, सचिव अविल बोरकर, पंचायत समिती भंडारा सहायक गट विकास अधिकारी एस.एस. तामगाडगे, तालुका कृषी अधिकारी भंडारा व पवनी चे ए.डी. गजभिये, मंडळ कृषी अधिकारी एन.एन. गांगुर्डे आदी उपस्थित होते.यावेळी अविल बोरकर, एस.आर. हुमणे, सेवानिवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे, पृथ्वीराज शेंडे, अरविंद कांबळे इत्यादींनी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाचा उद्देश, संकल्पना, विविध कामे व निवडीचे निकष, गाव पातळीवर जलयुक्त शिवार अभियान कसे महत्वपूर्ण ठरेल, अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत भंडारा व पवनी तालुक्यातील ४० गावातील सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे एकूण १२० प्रशिक्षणार्थी सहभागी होते. कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण समन्वयक नरेंद्र गणवीर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा चे सागर बागडे, विवेक नंदनवार, ज्वाला कोचे, वैशाली गणवीर, तालुका कृषी अधिकारी भंडारा व पवनी येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले.