शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

जलजीवन मिशनची योजना पाणीपुरवठा करण्यात नापास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:58 IST

बिनाखीत योजनेला विजेचा पुरवठाच नाही : योजना ठरतेय पांढरा हत्ती

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): बिनाखी येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन हर घर नल योजनेसाठी ७७ लाख ६४ हजार मंजूर करण्यात आले. नाल्याचे शेजारी योजनेचा पंपगृह बांधकाम करण्यात आले आहे. परंतु योजनेला विजेची जोडणी मिळाली नाही. भर उन्हाळ्यात योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. सोलर पंप मंजुरीसाठी ६ लाख ६२ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले असले तरी गावकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत.

गावात नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. गावकऱ्यांना हीच नळ योजना गेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठा करीत आहे. ही योजना कार्यान्वित असताना पुन्हा गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली आहे.

योजनेला १३ फेब्रुवारी २०२३ ला सुरुवात करण्यात आली आहे. योजनेसाठी ७७ लाख ६४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. योजनेचा पंपगृह नाल्याचे शेजारी बांधकाम करण्यात आले आहे. पंपगृह ते गावापर्यंत जलवाहिनीचे कामे करण्यात आली आहेत. नाल्यावर विहिरीचे बांधकाम करताना १९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

रिचार्ज सॉप्ट ५ लाख ३९ हजार आणि पंपगृहच्या कामात २ लाख ७० हजार रुपये करण्यात आले आहे. उध्वनलिका उभारणीत सर्वाधिक ७ लाख ८४ हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे.

गावात पिण्याचे पाणी घराघरात पोहचविण्यासाठी विवरण नलिका घालण्यात आले आहे. या कामात १४ लाख २३ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. परंतु जल जीवन मिशनच्या योजनेचे पाणी नळाला पोहचले नाही. याशिवाय पंपिंग मशिनरी १ लाख ६५ हजार रुपये, नळ जोडण्यासाठी १ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. एवढेच नाही तर योजना चालविण्यासाठी ७८ हजार रुपयाचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जुन्याच टाकीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. यात २ लाख ६५ हजार रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.

"गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यास जल जीवन मिशन हर घर नल योजना तयार आहे. परंतु योजनेच्या पंपगृह पर्यंत अद्याप विजेची जोडणी पोहचली नाही. फक्त खांब उभे करण्यात आले आहे. यामुळे मे महिन्यात गावकऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ वीज जोडणी दिली गेली पाहिजे."- देवेंद्र मेश्राम, सरपंच, बिनाखी.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater shortageपाणीकपात