शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जलजीवन मिशनची योजना पाणीपुरवठा करण्यात नापास !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:58 IST

बिनाखीत योजनेला विजेचा पुरवठाच नाही : योजना ठरतेय पांढरा हत्ती

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): बिनाखी येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन हर घर नल योजनेसाठी ७७ लाख ६४ हजार मंजूर करण्यात आले. नाल्याचे शेजारी योजनेचा पंपगृह बांधकाम करण्यात आले आहे. परंतु योजनेला विजेची जोडणी मिळाली नाही. भर उन्हाळ्यात योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. सोलर पंप मंजुरीसाठी ६ लाख ६२ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले असले तरी गावकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत.

गावात नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. गावकऱ्यांना हीच नळ योजना गेल्या अनेक वर्षापासून पाणी पुरवठा करीत आहे. ही योजना कार्यान्वित असताना पुन्हा गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली आहे.

योजनेला १३ फेब्रुवारी २०२३ ला सुरुवात करण्यात आली आहे. योजनेसाठी ७७ लाख ६४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. योजनेचा पंपगृह नाल्याचे शेजारी बांधकाम करण्यात आले आहे. पंपगृह ते गावापर्यंत जलवाहिनीचे कामे करण्यात आली आहेत. नाल्यावर विहिरीचे बांधकाम करताना १९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

रिचार्ज सॉप्ट ५ लाख ३९ हजार आणि पंपगृहच्या कामात २ लाख ७० हजार रुपये करण्यात आले आहे. उध्वनलिका उभारणीत सर्वाधिक ७ लाख ८४ हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे.

गावात पिण्याचे पाणी घराघरात पोहचविण्यासाठी विवरण नलिका घालण्यात आले आहे. या कामात १४ लाख २३ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. परंतु जल जीवन मिशनच्या योजनेचे पाणी नळाला पोहचले नाही. याशिवाय पंपिंग मशिनरी १ लाख ६५ हजार रुपये, नळ जोडण्यासाठी १ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. एवढेच नाही तर योजना चालविण्यासाठी ७८ हजार रुपयाचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जुन्याच टाकीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. यात २ लाख ६५ हजार रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.

"गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यास जल जीवन मिशन हर घर नल योजना तयार आहे. परंतु योजनेच्या पंपगृह पर्यंत अद्याप विजेची जोडणी पोहचली नाही. फक्त खांब उभे करण्यात आले आहे. यामुळे मे महिन्यात गावकऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तत्काळ वीज जोडणी दिली गेली पाहिजे."- देवेंद्र मेश्राम, सरपंच, बिनाखी.

टॅग्स :bhandara-acभंडाराwater shortageपाणीकपात