शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बावनथडी प्रकल्पातून साडेचार हजार हेक्टर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

२१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. तुमसर तालुक्यातील २१ गावांतील तब्बल साडेचार हजार हेक्टर सिंचन बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर करण्यात आले. धान पिकासह इतर पिकांसाठी या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर सितेकसा येथे बावनथडी नदीवर आंतरराज्यीय राजीव सागर प्रकल्प आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील पिकासाठी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. २१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.गत ४ मे रोजी तुमसर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बावनथडी प्रकल्पात पाणी सोडले. परिणामी, नळ योजनांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरत असून आता आगामी खरीप हंगामातील धान नर्सरीसाठी या प्रकल्पाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी आहेत. 

बावनथडी १७.४२ टक्के जलसाठा- बावनथडी प्रकल्पात सद्य:स्थितीत ४४.३७५ दलघमी जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या एकूण जलसाठ्याचा हा पाणीसाठा १७.४२ टक्के आहे. या प्रकल्पातील क्षमता ३४४.४० मीटर आहे. २३ मे रोजी या प्रकल्पाचा जलस्तर ३३७.१० मीटर होता. प्रकल्पाचे सहाही गेट सध्या बंद आहेत.

यावर्षी उन्हाळी हंगामासाठी नियोजनानुसार सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. आगामी खरीप हंगामात सिंचनासाठी १५ जूननंतर नियोजन करण्यात येईल. -प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंता,  पाटबंधारे विभाग, भंडारा

 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प