शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

बावनथडी प्रकल्पातून साडेचार हजार हेक्टर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

२१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला. तुमसर तालुक्यातील २१ गावांतील तब्बल साडेचार हजार हेक्टर सिंचन बावनथडी प्रकल्पाच्या पाण्यावर करण्यात आले. धान पिकासह इतर पिकांसाठी या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर सितेकसा येथे बावनथडी नदीवर आंतरराज्यीय राजीव सागर प्रकल्प आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील पिकासाठी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. २१ गावांतील साडेचार हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन करण्यात आले. यावर्षी प्रकल्पात पुरेसा जलसाठा असल्याने साडेचार हजार हेक्टर सिंचन करणे शक्य झाले. या प्रकल्पाचा लाभ तुमसर तालुक्यातील ८५ गावांना होतो. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आणि आवश्यकतेनुसार बावनथडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळेच या हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. धान पिकाला वेळेवर पाणी मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.गत ४ मे रोजी तुमसर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्याचे निर्देश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बावनथडी प्रकल्पात पाणी सोडले. परिणामी, नळ योजनांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरत असून आता आगामी खरीप हंगामातील धान नर्सरीसाठी या प्रकल्पाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी आहेत. 

बावनथडी १७.४२ टक्के जलसाठा- बावनथडी प्रकल्पात सद्य:स्थितीत ४४.३७५ दलघमी जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या एकूण जलसाठ्याचा हा पाणीसाठा १७.४२ टक्के आहे. या प्रकल्पातील क्षमता ३४४.४० मीटर आहे. २३ मे रोजी या प्रकल्पाचा जलस्तर ३३७.१० मीटर होता. प्रकल्पाचे सहाही गेट सध्या बंद आहेत.

यावर्षी उन्हाळी हंगामासाठी नियोजनानुसार सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. आगामी खरीप हंगामात सिंचनासाठी १५ जूननंतर नियोजन करण्यात येईल. -प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंता,  पाटबंधारे विभाग, भंडारा

 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प