उन्हाळी धानाच्या सिंचन क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:19+5:30
सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, मुरली, हरदोली, रुपेरा या गावांचा समावेश आहे.

उन्हाळी धानाच्या सिंचन क्षेत्रात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानपिकाची रोवणी व सिंचनासाठी उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यात आले असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, मुरली, हरदोली, रुपेरा या गावांचा समावेश आहे. उन्हाळी धानपिकाकरिता पाटबंधारे विभागाचे नियोजन झाले असून १८०० हेक्टर आर सिंचित क्षेत्र पाटबंधारे विभागाकडून निर्धारीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतशिवारात रोवणीला सुरुवात केली आहे. डिमांडधारक शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा, उतारा आणि रक्कम मागविण्यात आली आहे. डिमांडची आगावू रक्कम जमा करण्याचे निर्देश देऊनही अद्याप अनेक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाही. नियोजित सिंचित क्षेत्रफळानुसार करारनामा करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी रोवणीची लगभग सुरु केली असली तरी करारनाम्यासाठी मात्र शेतकºयांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाºयांची धावपळ होत आहे.
अनेक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी येऊन डिमांडसह करारनामे करण्यासाठी जनजागृती करीत आहेत. पाटबंधारे विभागाचे शेतकºयांकडे पाणीपट्टीकराचे ४ कोटी रुपयांचे थकबाकी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. थकबाकीदार शेतकºयांची संख्या मोठी असल्याने कर्मचाऱ्यांवर वसुलीचा भार पडत आहे. .
नियोजित हेक्टर आर क्षेत्रानुसार डिमांड धारक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
-टी.डी. डिंकवार, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक, सिहोरा.