वैनगंगा पुलावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:01:09+5:30

गत आठवड्याभरापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रविवारी दुपारी वैनगंगा पुलावरून जात असताना एका दुचाकीचालकाचा गंभीर अपघात झाला. खरीप हंगामाचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Increase in accidents due to life-threatening potholes on Wainganga bridge | वैनगंगा पुलावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

वैनगंगा पुलावर जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

ठळक मुद्देनिलज-पवनी राज्यमार्गावरील प्रकार : बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : निलज-पवनी-कारधा राज्यमार्गावर वैनगंगेच्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले असून नेहमीच होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आठवडाभरातून किमान दोन-तीन अपघाताच्या घटना घडत असतानाही या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे डोळेझाक होत आहे.
गत आठवड्याभरापासून पावसाला सुरुवात झाली असल्याने खड्ड्यात पाणी साचून आहे. त्यामुळे दुचाकीधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. रविवारी दुपारी वैनगंगा पुलावरून जात असताना एका दुचाकीचालकाचा गंभीर अपघात झाला. खरीप हंगामाचे दिवस असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता दुरुस्तीसाठी परिसरातील लोकप्रतिनिधींना अनेकदा सांगण्यात आले आहे. याच मार्गावरून अनेकदा जिल्हा परिषद सदस्य, तालुका दंडाधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची ये-जा असते. मात्र तरीदेखील याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. तर काही ठिकाणी रस्ता अरुंद बनल्याने अपघातात वाढ झाली आहे. नेहमीच होणाºया अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद होत नाही. निलज-पवनी-कारधा महामार्गाचे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बांधकामाची गती संथ असल्याने किमान खड्डे बुजविण्याचे काम करीत त्वरीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. नेहमीच होणाºया अपघातामुळे आणखी किती बळी प्रशासन घेणार आहे असा संतप्त सवाल वाहनधारक करीत आहेत.

Web Title: Increase in accidents due to life-threatening potholes on Wainganga bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात