शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

धर्मांतरित बौद्ध प्रवर्गाला अनुसूचित जातीत समाविष्ठ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:23 IST

अस्पृश्यता जातीभेद यामुळे निर्माण झालेली असमर्थता व मागासलेपणा यांचा संबंध धर्मांतराशी जोडू नये.

ठळक मुद्देचर्चासत्रातील सूर : राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्पृश्यता जातीभेद यामुळे निर्माण झालेली असमर्थता व मागासलेपणा यांचा संबंध धर्मांतराशी जोडू नये. अनुसूचित जातीला बौद्धधम्म स्विकारणाºयांना देखील अनुसूचित जातीच्या तरतुदी, संरक्षणे व सोयी सवलती लागू असाव्यात तसेच अनुसूचित जातीमधून धर्मांतरीत बौद्ध हा प्रवर्ग अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ठ करण्यात यावा.१९६२ पासून महाराष्ट्रात धर्मांतरीत बौद्धांना अ.जा. च्या सवलती मिळतात. परंतु ज्या प्रवर्गाला महाराष्ट्रात अ.जा. म्हणून आरक्षण आहे, त्यच बौद्धांना केंद्र सरकार आरक्षण देत नाही हा विरोधाभास आहे. १९९० च्या संविधान अ.जा.आदेश पारित केल्यानुसार अ.जा. च्या यादीमध्ये अ.जा. तून धर्मांतरीत बौद्ध हा प्रवर्ग समाविष्ट करणे आवश्यक होते. परंतु गेल्या २७ वर्षापासून हे झालेले नाही. त्यामुळे या प्रवर्गाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. असे मत संमेलनातील पहिल्या सत्रातील वक्ते माजी न्यायमुर्ती अनिल वैद्य यांनी व्यक्त केले.संमेलनातील दुसºया सत्रातील वक्ते डॉ. नितीन राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्धांची संख्या जवळपास १ कोटी आहे. हा बौद्ध समाज १९५६ पासून बौद्ध पद्धतीनुसार विवाह करतो हिंदू व बौद्ध धर्मियांच्या रूढी, परंपरा, श्रद्धतेत धार्मिक संस्कार, विधी, समारंभ, पद्धती भिन्न आहेत.१९७० च्या दशकात बौद्ध पद्धतीच्या विवाहाला न्यायालयाने बौद्ध विहार व वारस कायदा नसल्यामुळे बेकायदेशीर ठरविले होते. दुसºया न्यायालयाने बौद्ध पद्धतीनुसार होणारे विवाह कायदेशीर ठरविले. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी या धर्मियांचे स्वतंत्र विवाह कायदे आहेत मग बौद्ध धर्मियांचा स्वतंत्र विवाह कायदा कां असू नये, मी आमदार असताना २००७ साली महाराष्ट्र विधानसभेत बौद्ध विहार व वारस हक्क कायदा शासनाने मान्यताही दिली होती. परंतु अजूनही तो पूर्णत्वास आला नाही म्हणून शासनाने हा कायदा लवकर मंजूर करावा.बौद्ध संस्कृती सवंर्धनाचा प्रश्न पवनी येथील उत्खननाच्या संदर्भात या विषयावर प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक व्याख्यान झाले. भारतात बौद्ध स्थळांच्या केलेल्या उत्खननातले अवशेष मिळाले आहेत. त्यापैकी काही अपवाद वगळता बहुतेक स्थळे ही अजुनही दुर्लक्षित आहेत.पवनी येथे १९६९-७०-७१ साली पुरातत्व विभागातर्फे केल्या गेले. त्यात मौर्यपूर्व ते शुभ सातवाहून काळातील तीन बौद्ध स्तुप उघडकीस आले. जवळपास पन्नास वर्षात या स्तुपावर व परिसरात अतिक्रमण झाले. भारतीय सर्वेक्षण व पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात, त्यावर कुंपण करावे व या स्थळांना भेटी देणाºयांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात तसेच उर्वरित दोन स्थळाचेही उत्खनन करून सत्य उघडकीस आणावे जेणे करून भूर्गभात गडप असलेल्या बौद्ध संस्कृती व अवशेषाची लोकांना माहिती होईल, असा आशावाद डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी व्यक्त केला.