शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

धर्मांतरित बौद्ध प्रवर्गाला अनुसूचित जातीत समाविष्ठ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:23 IST

अस्पृश्यता जातीभेद यामुळे निर्माण झालेली असमर्थता व मागासलेपणा यांचा संबंध धर्मांतराशी जोडू नये.

ठळक मुद्देचर्चासत्रातील सूर : राज्यस्तरीय आंबेडकरी विचार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अस्पृश्यता जातीभेद यामुळे निर्माण झालेली असमर्थता व मागासलेपणा यांचा संबंध धर्मांतराशी जोडू नये. अनुसूचित जातीला बौद्धधम्म स्विकारणाºयांना देखील अनुसूचित जातीच्या तरतुदी, संरक्षणे व सोयी सवलती लागू असाव्यात तसेच अनुसूचित जातीमधून धर्मांतरीत बौद्ध हा प्रवर्ग अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ठ करण्यात यावा.१९६२ पासून महाराष्ट्रात धर्मांतरीत बौद्धांना अ.जा. च्या सवलती मिळतात. परंतु ज्या प्रवर्गाला महाराष्ट्रात अ.जा. म्हणून आरक्षण आहे, त्यच बौद्धांना केंद्र सरकार आरक्षण देत नाही हा विरोधाभास आहे. १९९० च्या संविधान अ.जा.आदेश पारित केल्यानुसार अ.जा. च्या यादीमध्ये अ.जा. तून धर्मांतरीत बौद्ध हा प्रवर्ग समाविष्ट करणे आवश्यक होते. परंतु गेल्या २७ वर्षापासून हे झालेले नाही. त्यामुळे या प्रवर्गाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. असे मत संमेलनातील पहिल्या सत्रातील वक्ते माजी न्यायमुर्ती अनिल वैद्य यांनी व्यक्त केले.संमेलनातील दुसºया सत्रातील वक्ते डॉ. नितीन राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील धर्मांतरीत बौद्धांची संख्या जवळपास १ कोटी आहे. हा बौद्ध समाज १९५६ पासून बौद्ध पद्धतीनुसार विवाह करतो हिंदू व बौद्ध धर्मियांच्या रूढी, परंपरा, श्रद्धतेत धार्मिक संस्कार, विधी, समारंभ, पद्धती भिन्न आहेत.१९७० च्या दशकात बौद्ध पद्धतीच्या विवाहाला न्यायालयाने बौद्ध विहार व वारस कायदा नसल्यामुळे बेकायदेशीर ठरविले होते. दुसºया न्यायालयाने बौद्ध पद्धतीनुसार होणारे विवाह कायदेशीर ठरविले. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी या धर्मियांचे स्वतंत्र विवाह कायदे आहेत मग बौद्ध धर्मियांचा स्वतंत्र विवाह कायदा कां असू नये, मी आमदार असताना २००७ साली महाराष्ट्र विधानसभेत बौद्ध विहार व वारस हक्क कायदा शासनाने मान्यताही दिली होती. परंतु अजूनही तो पूर्णत्वास आला नाही म्हणून शासनाने हा कायदा लवकर मंजूर करावा.बौद्ध संस्कृती सवंर्धनाचा प्रश्न पवनी येथील उत्खननाच्या संदर्भात या विषयावर प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांचे अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक व्याख्यान झाले. भारतात बौद्ध स्थळांच्या केलेल्या उत्खननातले अवशेष मिळाले आहेत. त्यापैकी काही अपवाद वगळता बहुतेक स्थळे ही अजुनही दुर्लक्षित आहेत.पवनी येथे १९६९-७०-७१ साली पुरातत्व विभागातर्फे केल्या गेले. त्यात मौर्यपूर्व ते शुभ सातवाहून काळातील तीन बौद्ध स्तुप उघडकीस आले. जवळपास पन्नास वर्षात या स्तुपावर व परिसरात अतिक्रमण झाले. भारतीय सर्वेक्षण व पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात, त्यावर कुंपण करावे व या स्थळांना भेटी देणाºयांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात तसेच उर्वरित दोन स्थळाचेही उत्खनन करून सत्य उघडकीस आणावे जेणे करून भूर्गभात गडप असलेल्या बौद्ध संस्कृती व अवशेषाची लोकांना माहिती होईल, असा आशावाद डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे यांनी व्यक्त केला.