शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्याअभावी शेतकरी ऊस सोडून धानात झाले व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 18:21 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : जिल्ह्यात उसाचे क्षेत्र केवळ १८१५ हेक्‍टर

देवानंद नंदेश्वर

भंडारा : कृषी विभागाने नगदी पिकाबाबत प्रोत्साहन दिले. मात्र गत काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि चुकाऱ्यांना होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी उसाऐवजी पुन्हा धान लागवडीकडे वळले आहेत. जिल्ह्यात साखर कारखान्याअभावी उसाचे क्षेत्र कमी झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पूर्वापार धानाची लागवड करीत आहेत. परंतु, त्यातही तेल व डाळवर्गीय पिकांसोबत कडधान्य, भाजीपाला, ऊस आदी पिके घेतली जात असल्याचा उल्लेख इंग्रज शासन काळातील गॅझेटियरमध्ये आहे. साकोली, तुमसर तालुक्‍यातील गुळाचा मध्यप्रदेश व विदर्भातील जिल्ह्यात व्यापार केला जात होता. आधुनिक काळात कृषी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. सिंचनाच्या सोयीनुसार शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. १९८० च्या दशकात जिल्ह्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांना नगदी पीक घेता यावे, यादृष्टीने प्रयत्न करून सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू केला. त्यानंतर पवनी तालुक्‍यात आणखी एका कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आपसातील ओढाताणीमुळे तो कारखाना पूर्ण झालाच नाही.

दरम्यान, नगदी पीक घेण्याबाबत शासन व कृषी विभागाने प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्यावर भर दिला. या पिकाला सिंचनाची अधिक गरज असते. त्याबाबत भंडारा जिल्ह्यात तलाव, बोड्या विपुल प्रमाणात असल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे शेकडो टन उसाचा साखर कारखान्यांना पुरवठा होत होता. जिल्ह्यात उसाचे उत्पादन अधिक होत असल्याने मौदा व उमरेड तालुक्‍यातील कारखान्यांनासुद्धा जिल्ह्यातून ऊस पुरवठा केला जात होता. दरम्यान, सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आल्याने त्याची विक्री करण्यात आली.

लाखांदूर येथे एक लघु साखर कारखाना स्थापन करण्यात आला. त्याचा फायदा लाखांदूर व चौरास भागातील शेतकऱ्यांना होत होता. त्यावेळी जिल्ह्यातील उसाच्या पिकाखालील क्षेत्र १५ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक होते. मात्र, कारखान्यांकडून चुकाऱ्यांना होणारा विलंब, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत गेल्याने शेतकऱ्यांना उसाचे पीक परवडेनासे झाले. शेवटी लाखांदूर येथील साखर कारखानाही बंद पडला. त्यामुळे शेतकरी पुन्हा आपल्या पारंपरिक पिकाकडे वळले आहेत. यावर्षी जिल्ह्यातील उसाचे एकूण क्षेत्र १८१५ हेक्‍टर आहे.

वन्यप्राण्यांची वाढती संख्या

जिल्ह्यात कोका, न्यू नागझिरा आणि कऱ्हांडला- पवनी- उमरेड हे नवीन अभयारण्य झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्‍यांतील अनेक गावे अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येतात. गावाजवळील जंगलातून रानडुकरे व अन्य प्राणी उसाच्या वाडीत आश्रय घेतात. त्यांच्या शिकारीसाठी बिबटे व हिंस्र प्राणीही शेतात आल्याने शेतकऱ्यांसोबत वन्यप्राण्यांचा संघर्ष वाढला आहे. पवनी तालुक्‍यात व कोका या गावाजवळ उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड करणे बंद केले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रbhandara-acभंडाराFarmerशेतकरी