शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:01 PM

शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देभंडाºयात पत्रपरिषद : प्रफुल पटेल यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून कुठलाही वर्ग सुखी व समाधानी नाही. याला शासन जबाबदार आहे असा आरोप खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केला.दुपारी १२ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी स्कॉलरशिप, आपादग्रस्त शेतकºयांना मदत, कर्जमाफीचा सरसकट लाभ ही बाब सर्वसामान्यांसह सर्वांनाच संभ्रमात घालणारी आहे. पिक विम्याची स्थिती फार वाईट असताना खासगी कंपन्याही शेतकºयांचे ऐकत नाही. मागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पिक विम्याचा किती लाभ मिळाला याची आकडेवारी पाहिल्यास हे समजून येईल. दुष्काळाच्या स्थितीबाबत बोलताना पटेल म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कृषीपंपांना नियमित वीज नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवणार आहे. प्रकल्पामध्ये पाण्याचा साठाच नसल्याने सिंचनाला पाणी तरी कुठून द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत सत्तेतील पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस न बरसल्यास जिल्ह्यात दुष्काळी स्थितीला अजून हातभार लागणार आहे. पालिकेत विरोधकांची भूमिका जोरदार वठवू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. जिल्हा महिला रुग्णालयाच्या मुद्यावर प्रशासनातील मंत्री, अधिकारी बोलायला तयार नाहीत. अच्छे दिनाच्या नावावर सर्वसामान्यांची गळचेपी होत असल्याचाही घणाघाती आरोप खा.पटेल यांनी लावला.पत्रकार परिषदेला माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, ज्येष्ठ नेते धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे आदी उपस्थित होते.