शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

रुग्णालयाची वसाहत भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:17 PM

येथील ग्रामीण रुग्णालय वसाहत इमारतीचे बांधकाम गत १५ वर्षांपासून होऊन उभी असुन रंगरंगोटी झाली आहे.

ठळक मुद्देलाखांदुरातील प्रकार : १५ वर्षांपासून इमारत हस्तांतरण नाही, शासनाचे लाखो रुपये पाण्यात

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : येथील ग्रामीण रुग्णालय वसाहत इमारतीचे बांधकाम गत १५ वर्षांपासून होऊन उभी असुन रंगरंगोटी झाली आहे.मात्र संबंधित विभागाला अद्यापही हस्तांतरण झालेली नाही.येथे सध्या वन्यप्राणी, किड्यांनी जागा धरली असून उकिरडे निघत आहे.खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. याची कल्पना लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिल्या आहेत. मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.नवनवीन कामातून टक्केवारी मिळते म्हणून नवीन बांधकामाकडे कंत्राटदार मोर्चा वाढविताना दिसतात. त्यामुळे ही इमारत भग्नावस्थेत आली आहे. २० लाख रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीला व आरोग्य अधिकारी कर्मचाºयांसाठी सोय व्हावी म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च केले.मात्र कंत्राटदार व लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन भूमिकेमुळे शासनावर अधिकचा भर दिवसेंदिवस पडत आहे. त्यामुळे याकडे कुणीतरी लक्ष देईल का?असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. लाखांदूर तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे या तालुक्याला येणारा निधी, योजना या सर्वांच्या शेवटी येत असतात. लाखांदूर येथील आरोग्य विभागाच्या अनेक समस्या आहेत.मात्र याकडे लोकप्रतिनिधी डोळेझाक करून भावनिक समजूत घालून आपलेच काम काढून घेण्यात मश्गुल असतात. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीसाठी लाखांदूर-साकोली महामार्गावर जागा मुकरार करून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मागील १५ वर्षापुर्वी २० लाख रुपये खर्च करून इमारत बांधकाम केले. रंगरंगोटी केली. विद्युत पुरवठाही सुरू केला होता. त्यावेळी कंत्राटदारांची माशी कुठे शिंकली कुणाशी माहीत त्या इमारतीचे हस्तांतरण होऊ शकले नाही. त्यामुळे ती इमारत भग्नावस्थेत उभी असुन खाली जागेत काही नागरीक अतिक्रमण करीत आहेत. काही आरोग्य कर्मचारी मुख्यालयी न राहता 'अपडाऊन'करतात तर, काही कर्मचारी लाखांदुरात राहतात. अर्ध्याअधिक जागा रिक्त असल्याने काही कर्मचाºयांवर अधिकचा ताणही पडत आहे. मात्र ना जागा भरायची, ना वसाहत इमारत हस्तांतरण करायची असा पवित्रा लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य सेवेसाठी जनता तर, सुस्थितीतील वसाहतीत राहण्यासाठी कर्मचारी चातकासारखी प्रतिक्षा करीत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बांधकाम पूर्णत्वासाठी १५ लाखांची गरजग्रामीण रुग्णालयाची वसाहत इमारत पूर्णत्वास नेण्याकरिता १५ लाख रुपयांची गरज आहे. एखाद्या तरी लोकप्रतिनिधीने आपल्या निधीतून खर्ची घालून तालुकावासीयांसाठी व अधिकाºयांसाठी बांधकामासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.