दमदार पावसाने उन्हाळी धानाच्या कडपा पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:01:28+5:30
पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.

दमदार पावसाने उन्हाळी धानाच्या कडपा पाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी: दमदार पावसाच्या हजेरीने चौरास पट्टातील उन्हाळी धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात काही प्रमाणात मळणी करताना तर काही कापणी होताना शेकडो क्विंटल धानाच्या कडपा पाण्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.
दरवर्षीच ऐन पीक हाती येत असताना निसर्गाची अवकृपा होऊन शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. झालेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना पिकासाठी केलेला व्यवहार कसा सोडवायचा, हा चिंतनीय प्रश्न असल्यामुळे समस्यांचा डोंगर कोसळण्याचे चित्र निर्माण होत आहे.
आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेने दिलासा मिळाला असला तरी शेतातून मिळणाºया उत्पन्नाने अपेक्षित रोजनिशी लागणारा कौटुंबिक अत्यावश्यक खर्च सांभाळण्याची स्थिती नसतांना उन्हाळी पिकांचे होणारे नुकसान यात भर पाडणारी आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतशिवारात झालेल्या दमदार पावसाने धान पिकांची भयानक नुकसान झाले आहे. काहींची पिके शेतात कापणीसाठी उभी आहेत काहींची कापणी होऊन शेतात कडपा ओलेचिंब अवस्थेत पडल्या आहेत. काहींचे धान मळणी करताना पावसात सापडले आहेत. एरवी देशाचा पोषणकर्ता असणाºया शेतकºयांचे हाल निसर्गाच्या झालेल्या अवकृपेमुळे बेहाल होतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, बँका व खासगी कजार्तून मुक्तता आदी प्रश्न आवासून उभे आहेत.
तालुक्यातील उन्हाळी पीक क्षेत्राच्या गावाचे भ्रमण केले असता अनेक गावात शेतकरी मळणी केल्यानंतर पाण्यात भिजलेले धान अंगणात वाळवितांना दिसले, तर काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीला शेतावर नेऊन होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली. याप्रसंगी संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांनी शासनाकडून शेतीचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक मदत करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यरंभ करण्याची मागणी केली आहे.