जंगलव्याप्त परिसरातून धावणाऱ्या डिझेल रेल्वेची वाहतूक धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST2019-12-22T06:00:00+5:302019-12-22T06:00:24+5:30
तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालवाहतूक व प्रवाशी गाड्या या मार्गावरून दररोज धावतात.

जंगलव्याप्त परिसरातून धावणाऱ्या डिझेल रेल्वेची वाहतूक धोकादायक
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड-तिरोडी ब्रिटीशकालीन रेल्वेमार्गाचे अद्यापही विद्युतीकरण झालेले नसल्याने सातपुडा पर्वतरांगेतील राखीव जंगलातून धावणाºया डिझेल इंजिनने वाहतूक सुरु आहे. रेल्वेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वन्यप्राण्यांचा एकांतवास धोक्यात आला आहे.
नागपूर विभागात रेल्वेला सर्वात जास्त महसूल या मागातूनच प्राप्त होत असल्याने प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. जगप्रसिद्ध खाणीतील मॅग्नीज वाहतुकीमुळे रेल्वेला मोठा महसूल येथे मिळत आहे.
तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालवाहतूक व प्रवाशी गाड्या या मार्गावरून दररोज धावतात.
विद्युतीकरणाचा प्रस्ताव नाही
रेल्वेचे सर्वत्र विद्युतीकरण होत आहे. परंतु तुमसर-तिरोडी रेल्वेमार्गाचा अद्याप विद्युतीकरणाचा प्रस्ताव नसल्याची माहिती आहे. नागपूर विभागात सर्वात जास्त महसूल रेल्वेला या मार्गावरुन मिळत आहे.
जंगलातून जाणारा रेल्वे मार्ग
तुमसर परिसर जंगलव्याप्त आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी वास्तव्य करतात. डिझेल इंजिनचा घोंगावणारा आवाज त्यांचा एकांतवास भंग करतात. वन्यप्राणी वास्तव्याला असणाऱ्या मार्गाला संरक्षित क्षेत्र घोषीत करण्याचा नियम आहे. यापूर्वी कोळसाचा वापर रेल्वे इंजिनसाठी केला जात होता आता डिझेलचा वापर होत आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत
तुमसर-तिरोडी रेल्वे मार्ग उत्तर भारतात जाणारा महत्वपूर्ण रेल्वेमार्ग आहे. रेल्वेस्थानकाचा विकास व इतर सोयी सुविधा येथे प्रवाशांना मिळत नाहीत. अस्तित्वात असलेले रेल्वेस्थानक शेवटची घटका मोजत आहे. कोट्यवधींचा महसूल देणारा रेल्वेमार्गावर किमान विद्युतीकरण करण्याची गरज असून सुविधा वाढवण्याची आवश्वकता आहे.