भंडारा : वैष्णवी हगवणे यांचे मृत्यू प्रकरण राज्यात गाजत आहे. तपासाअंती बरेचसे मुद्दे समोर येत असल्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना कोणत्या पातळीला जाऊ शकतात याचा ऊहापोह सुरू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील गत पाच महिन्यांत तक्रारींच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जवळपास २७५ टक्के प्रकरणे ही पैशासाठी छळ केल्याच्या आहेत.
भंडारा राज्याच्या पूर्व टोकातर वसलेला सात तालुक्यांचा जिल्हा महिन्याकाठी महिलांवर विविध बाचींवरील छळांच्या ३० ते ३५ तक्रारी सातत्याने दाखल होत असतात. यात विविध कारणे असली तरी कौटुंबिक कलह आणि हुंडधाराठी विवाहितेचा छळ होत असल्याचे दिसून येते. महिलेला असभ्य वागणूक देणे, माहेरच्या व्यक्तींना शिवीगाळ करणे, अशा बाबी घडत असतात, मात्र समाज काय म्हणेल या भीतीपोटी विवाहिता गप्प बसतात. त्याचीच फलश्रुती महिलांवरील अत्याचार वाढत असतात.
लहान-सहान कारणांनी केली जाते मानसिक पिळवणूक२०२७ मध्ये जानेचारी ते एप्रिल या कालावधीत स्त्रियांनी पुरुषांविरूद्ध ८४ तक्रारी केल्या. महिलांच्या छळाच्या सर्वाधिक तक्रारी पोलिसांत नोंद झाल्या. पतीने वा सासरच्या मंडळीने हुंडयासाठी प्रास दिल्याची कारणे दिली आहेत. तसेच अन्य बाबीही संसारामध्ये कुस्बुरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. यात मुलांचा सांभाळ न करणे, चारीत्र्यावर संशय, माहेरच्या नावे टोमणे अशी कारणे असतात.
शहरातील प्रमाण अधिकमहिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली जाते. या तक्रारींमध्ये ग्रामीणपेक्षा शहरातील तक्रारींचा भरणा अधिक आहे. भरोसा सेलकडे ते वर्ग करण्यात येते. त्यांची पोलिसांकडून समुपदेशनाच्या माध्यमातून समजूत काढण्यावर भर दिला जातो; मात्र काही तक्रारी समजण्यापलीकडे असतात. अशावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायद्यांचा आधार घेत न्यायालयात न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो.
गत चार महिन्यांत एकूण ८४ तक्रारीमहिलांच्या छळाविषयी भंडारा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गत चार महिन्यांत एकूण ८४ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. समुपदेशनाने मार्ग काढता येईल, यासाठी ती प्रकरणे भरोसा सेलकडे दिली जातात. यात इंडबासाठी महिला पिळवणुकीच्या तक्रारींची संख्या २०च्या जवळपास आहे. गत मे महिन्यात महिला छळतणुकीच्या सहा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत,