शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

गरिबांच्या उत्थानासाठी शासकीय योजना

By admin | Updated: April 2, 2015 00:57 IST

सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे.

मोहाडी : सध्याचे युग हे परिश्रमाचे व स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात मानसाने देशाच्या भरभराटीच्या उद्देशाने कार्य केले पाहिजे. जेव्हा मनुष्य मोठा होतो, तेव्हा त्यावेळी आपण मागे वळून पाहिले पाहिजे. भारत सरकारच्या पडोस युवा संसद कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला फार चांगले संधी लाभली आहे. या माध्यमातून समाजकारणाची व त्याबरोबर देशाच्या सेवेची संधी प्राप्त होईल. आज समाजाच्या हिताच्या दृष्टीने कार्य शासन करत आहे. गरीबांच्या उत्थानासाठी योजना राबविल्या आहेत, असे मत नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर यांनी व्यक्त केले.नेहरू युवा केंद्र भंडारा व नेहरू युवा मंडळ मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पडोस युवा संसद कार्यक्रमात ते बोलत होते.उद्घाटन स्वामी विवेकानंद यांच्या छायाचित्राचे माल्यार्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले. त्याप्रसंगी रमेश अहीरकर, नरेंद्र निमकर, अशोक हलमारे, यशवंत थोटे, राहुल डोंगरे, वैशाली सतदेवे, वैशाली गांगुर्डे, दिव्या माटे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान, संसद आदर्श योजना मे भागिदारी, सुशासन को बढावा देणा और उसका अभ्यास श्रमदान के साथ ही शिक्षा, स्वास्थ्य परिवार कल्याण और पोषण पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, सुशासन व नागरिक शिक्षा और सामाजिक मुद्दे या विषयावर मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात आले.प्रास्ताविक नेहरू युवा मंडळाचे सदस्य प्रशांत गायधने यांनी केले. संचालन सपना वैद्य व दिपाली मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन महान निमजे यांनी केले. कर्यक्रमाला तालुक्यातील युवा मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य महेंद्र धकाते, सौरभ जाधव, निलेश सोनकुसरे, शुभम पारधी, राधेश्याम डेकाटे, सौरभ पातरे, वामन डेकाटे, भुमेश्वर श्रीपाद व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)