आगीत घर जळून खाक
By Admin | Updated: May 6, 2017 00:19 IST2017-05-06T00:19:12+5:302017-05-06T00:19:12+5:30
तालुक्यातील नेरी येथील दिवारू राजाराम सेलोकर यांच्या घराला अचानकपणे आग लागुन घरातील कपडे, भांडी, गहू, तांदुळ व सोन्याचे दागिणे जळून खाक झाले.

आगीत घर जळून खाक
नेरी येथील घटना : आगीत तीन लाख रूपयांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील नेरी येथील दिवारू राजाराम सेलोकर यांच्या घराला अचानकपणे आग लागुन घरातील कपडे, भांडी, गहू, तांदुळ व सोन्याचे दागिणे जळून खाक झाले. या आगीत २ लाख ८३ हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले. पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वेळीच जाग आल्याने अनर्थ टळला.
नेरी येथे दिवारु सेलोकर यांचे घर आहे. रात्री जेवन करुन सर्वजण झोपी गेले. पहाटे अचानक घराला आग लागल्याने लक्षात आल्याने परिवाराचे सदस्य घराबाहेर पळाले तोपर्यंत आगीने संपुर्ण घराला कवेत घेतले होते. त्यामुळे घरातून कोणतीही वस्तु बाहेर काढता आली नाही.
यात ४ क्विंटल तांदुळ १६ हजार रूपये, गहु ६ क्विंटल १२ हजार रूपये, तुरडाळ ५० किलो तसेच इतर प्रकारचे धान्य व तीन तोळे सोने ९० हजार रूपये असे एकुण २ लक्ष ८३ हजार ८०० रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.
दिवारू सेलोकर यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. संपुर्ण घर जळाल्यामुळे त्यांना घराची दुरुस्ती कशी करावी याची चिंता लागली आहे.
त्यामुळे सेलोकर यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत करण्याची मागणी सरपंच शारदा धुर्वे, पोलीस पाटील योगेश्वर माकडे, बाबु सेलोकर, जगदीश सेलोकर, राजेंद्र कारेमोरे, सेवक मलेवार यांनी केली आहे. आगीचा तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल मोहाडी तहसिल कार्यालयात पाठविलेला आहे.