शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो पेरणीसाठी घरचे बियाणे वापरा आणि सेंद्रिय खतावर भर द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:08 IST

कृषी केंद्रावर अवलंबून राहू नये : शेतकरी संघटनेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांनी वाढलेली फसवणूक व लुबाडणूक टाळण्यासाठी कृषी केंद्रांवर अवलंबून राहू नये. घरीच बीज प्रक्रिया करून निर्जंतुक बियाणे पेरणीसाठी तयार करावे. महागड्या रासायनिक खतांचा वापर मर्यादित करावा. स्वतःच बी-बियाणे तयार करून साठवणूक करावी. जैविक खते, गांडूळ खत, सोनखत आदींचा वापर करावा, असा सल्ला राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी अभय रंगारी यांनी दिला आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित कृषी केंद्रात रासायनिक खताची शेतकऱ्यांना विक्री करून १६ लाख ४२ हजारांनी फसवूणक करण्यात आली. तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या तपासणीत १२९.२५ मेट्रिक टन बोगस खताचा साठा जप्त करण्यात आला. हंगामात बोगस बी-बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी तसेच बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बियाण्यांसंबंधी वाढल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीदरवर्षी बियाणे, खतांसंबंधीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. शेतकरी कर्ज घेऊन पिकांची लागवड करतो. मात्र, कृषी केंद्रातील बियाणे पेरणी केल्यानंतर अनेकदा उगवतच नाही. उगवले तर भेसळीचे प्रमाण अधिक असते. काही वेळेस पीक वेळेत कापणीला येत नसल्याने नुकसान होते.

...तर कृषी केंद्रांवर व्हावी कठोर कारवाईखरीप हंगामात फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच तपासणी करून बोगस बियाणे व खताला आळा घालण्यासाठी कठोर तपासणी व कारवाई करावी, प्रसंगी कृषी केंद्र निलंबीत करावे, अशी मागणीही शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

अन्य राज्यांतून बोगस खते, बियाणे विक्रीची शक्यता

  • खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने लवकरच पेरणीसाठी शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी कृषी केंद्रात धाव घेणार आहेत. मात्र, त्यांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा प्रसंगी अनेक कृषी केंद्र चालक घेतात. शेतकऱ्यांची फसवणूक करतात.
  • अधिक नफा कमविण्यासाठी बोगस खत कंपन्या, वितरक यांच्याशी संगनमत करून कृषी केंद्र चालक राज्यात परवाना नसलेल्या बी-बियाणे, रासायनिक खते विक्रीस आणू शकतात. राज्याला लागून असलेल्या अन्य राज्यातून बोगस खत व बियाणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"कृषी विभागाने बी-बियाणे व खतांचा तपासणी अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावण्यासाठी केंद्राला बंधनकारक करायला पाहिजे. तसेच भरारी पथकांनी कितीदा तपासणी केली, किती नमुने गोळा केले, प्रयोगशाळेत पाठविले, याचाही अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावावा."- अभय रंगारी, जिल्हा प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चा.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी