शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: पाकिस्तानवर सडकून टीका करणारे असदुद्दीन ओवैसी झाले अवघ्या भारताचे हिरो!
2
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘त्या’ वक्तव्याने वाद; विरोधकांकडून टीका; भाजपची सारवासारव
3
पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा
4
राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी
5
अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!
6
‘स्नॅपचॅट’वरील ओळख विद्यार्थिनीला महागात! अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
7
४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड
8
बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार
9
IPL 2025 PBKS In Final: एक चूक नडली! कॅच सुटला तिथंच MI च्या हातून मॅचही निसटली (VIDEO)
10
महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण
11
यंदा नवा चॅम्पियन! MI 'आउट'; PBKS ला फायनलमध्ये नेत श्रेयस अय्यरनं रचला इतिहास
12
रायगड किल्ल्यावर उत्खननात आढळले 'यंत्रराज' सौम्ययंत्र खगोलशास्त्रीय उपकरण
13
IPL मध्ये सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम! एबी डिव्हिलियर्सच्या विक्रम मोडीत काढत रचला नवा इतिहास
14
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
15
IPL 2025 Qualifier 2 : हार्दिक पांड्यानं Josh Inglis ची विकेट घेतली अन् अंपायर आला चर्चेत, कारण...
16
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
17
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
18
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
19
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
20
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

शेतकऱ्यांनो पेरणीसाठी घरचे बियाणे वापरा आणि सेंद्रिय खतावर भर द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:08 IST

कृषी केंद्रावर अवलंबून राहू नये : शेतकरी संघटनेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांनी वाढलेली फसवणूक व लुबाडणूक टाळण्यासाठी कृषी केंद्रांवर अवलंबून राहू नये. घरीच बीज प्रक्रिया करून निर्जंतुक बियाणे पेरणीसाठी तयार करावे. महागड्या रासायनिक खतांचा वापर मर्यादित करावा. स्वतःच बी-बियाणे तयार करून साठवणूक करावी. जैविक खते, गांडूळ खत, सोनखत आदींचा वापर करावा, असा सल्ला राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी अभय रंगारी यांनी दिला आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित कृषी केंद्रात रासायनिक खताची शेतकऱ्यांना विक्री करून १६ लाख ४२ हजारांनी फसवूणक करण्यात आली. तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या तपासणीत १२९.२५ मेट्रिक टन बोगस खताचा साठा जप्त करण्यात आला. हंगामात बोगस बी-बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी तसेच बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बियाण्यांसंबंधी वाढल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीदरवर्षी बियाणे, खतांसंबंधीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. शेतकरी कर्ज घेऊन पिकांची लागवड करतो. मात्र, कृषी केंद्रातील बियाणे पेरणी केल्यानंतर अनेकदा उगवतच नाही. उगवले तर भेसळीचे प्रमाण अधिक असते. काही वेळेस पीक वेळेत कापणीला येत नसल्याने नुकसान होते.

...तर कृषी केंद्रांवर व्हावी कठोर कारवाईखरीप हंगामात फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच तपासणी करून बोगस बियाणे व खताला आळा घालण्यासाठी कठोर तपासणी व कारवाई करावी, प्रसंगी कृषी केंद्र निलंबीत करावे, अशी मागणीही शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

अन्य राज्यांतून बोगस खते, बियाणे विक्रीची शक्यता

  • खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने लवकरच पेरणीसाठी शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी कृषी केंद्रात धाव घेणार आहेत. मात्र, त्यांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा प्रसंगी अनेक कृषी केंद्र चालक घेतात. शेतकऱ्यांची फसवणूक करतात.
  • अधिक नफा कमविण्यासाठी बोगस खत कंपन्या, वितरक यांच्याशी संगनमत करून कृषी केंद्र चालक राज्यात परवाना नसलेल्या बी-बियाणे, रासायनिक खते विक्रीस आणू शकतात. राज्याला लागून असलेल्या अन्य राज्यातून बोगस खत व बियाणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"कृषी विभागाने बी-बियाणे व खतांचा तपासणी अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावण्यासाठी केंद्राला बंधनकारक करायला पाहिजे. तसेच भरारी पथकांनी कितीदा तपासणी केली, किती नमुने गोळा केले, प्रयोगशाळेत पाठविले, याचाही अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावावा."- अभय रंगारी, जिल्हा प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चा.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी