शेतकऱ्यांनी गर्दी न करता बियाणे घ्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:01:07+5:30

खरीप हंगामास सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे एक लाख ९४ हजार ३९८ हेक्टर, तूर पिकाचे १२ हजार १६ हेक्टर व सोयाबीन पिकाचे ५५० हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत भात पिकाचे ३३११३.०५ क्विंटल, तूर पिकाचे १४६.८ क्विंटल व सोयाबीन पिकाचे ३२९.९ बियाणे उपलब्ध झालेले आहे.

Farmers should take seeds without crowding | शेतकऱ्यांनी गर्दी न करता बियाणे घ्यावीत

शेतकऱ्यांनी गर्दी न करता बियाणे घ्यावीत

ठळक मुद्देबियाण्यांचा साठा मुबलक : ६७ हजार ७८० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामास सुरुवात झाली असून भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे एक लाख ९४ हजार ३९८ हेक्टर, तूर पिकाचे १२ हजार १६ हेक्टर व सोयाबीन पिकाचे ५५० हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. आतापर्यंत भात पिकाचे ३३११३.०५ क्विंटल, तूर पिकाचे १४६.८ क्विंटल व सोयाबीन पिकाचे ३२९.९ बियाणे उपलब्ध झालेले आहे. मागणीनुसार बियाणे पुरवठा सुरु असून कोणत्याही तालुक्यात बियाणांची टंचाई भासणार नाही, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकारी यांनी दिली आहे.
शासनाकडून जिल्ह्यास युरीया खताचे २५ हजार ५२० मेट्रिक टन, डिएपी खताचे तीन हजार ५०० मेट्रिक टन, एमओपी खताचे एक हजार ३६० मेट्रिक टन, इतर संयुक्त खताचे २९ हजार ३६० मेट्रिक टन व एसएसपी खताचे १२ हजार ४० मेट्रिक टन असे एकूण ६७ हजार ७८० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झालेले असून दोन जून २०२० रोजी जिल्ह्यात युरीया खताचे सहा हजार ९०० मेट्रिक टन, डिएपी खताचे ६५० मेट्रिक टन, एमओपी खताचे २२० मेट्रिक टन व इतर संयुक्त खताचे १४ हजार २८० मेट्रिक टन व एसएसपी खताचे १० हजार ६३० मेट्रिक टन असे एकूण ३२ हजार ६८० मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झालेला आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलबध झाले असून कोणत्याही तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही. शेतकºयांनी शक्य असल्यास आतापासून बी-बियाणे, खते खरेदी करावे जेणेकरुन हंगामात दुकानात गर्दी होणार नाही व फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून सर्वांना आवश्यकतेनुसार बी-बियाणे, खते मिळतील, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी व्ही.जी. पाडवी व मोहिम अधिकारी व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे.

Web Title: Farmers should take seeds without crowding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.