शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकरी संकटात, धान बांधणीचा खर्च प्रतिएकर तीन हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:05 IST

Bhandara : मोफत योजनांमुळे धान कापणी, बांधणीसाठी मजूर मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा कीड व रोगांमुळे, तसेच धान कापणीच्यावेळी लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच मोफतच्या शासकीय योजनांमुळे धान कापणी, बांधणी व मळणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. शिवाय दरात वाढ झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. धान बांधणीसाठी सध्या प्रति एकर धान बांधणीसाठी मजुरांना ३,००० ते ३,५०० रुपये मोजावे लागत आहेत.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत धान कापणीसाठी महिला मजुरांना २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत, तर बांधणीसाठी पुरुषांकडून प्रतिदिन ४५० ते ५०० रुपये मजुरी घेतली जात आहेत. मागील काही वर्षांपासून धान बांधणीसाठी हुंडा पद्धती वाढली आहे. कापणीसाठी २५०० ते ३००० हजार रुपये प्रति एकरचा दर मजुरांकडून घेतला जात आहे. यावर्षी उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती आहे. शेती व्यवसाय आता अधिकच कठीण होऊन बसला आहे. अवाढव्य दरवाढ झाल्याने शेती करणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. 

खते आणि आणि कीटकनाशके महागली आहेत. परिणामी प्रति एकर लागवडीचा खर्चही वाढलेला आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, पाइप, मोटारपंप, विद्युत बिल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या मजुरांची आहे. शेतीच्या कामासाठी शोधूनही मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाल्यास त्याच्या मर्जीनुसार मजुरी द्यावी लागत आहे. आता यांत्रिकीकरणामुळे थोडेसे सोपे झाले असले, तरी विविध उपकरणांच्या वाढत्या किमती, त्यांना लागणाऱ्या इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत धान कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. 

खर्चाच्या तुलनेत हमीभाव परवडेना यंदा धानाला हमीभाव अ ग्रेडसाठी २,३२० रुपये, तर ब ग्रेडसाठी २३०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे. मागील पाच वर्षांत धानाचा हमीभाव फारसा वाढलेला नाही. तुलनेत इंधन, कीटकनाशके आणि शेती अवजारांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आधुनिक यंत्रामुळे पारंपरिक शेती व्यवसाय लोप पावला आहे. त्यातच दरवर्षी शेतकऱ्यांना बारदाणा खरेदी करताना विनाकारण जास्त पैसे मोजावे लागतात.

"सध्या खर्चाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न तोकडे आहे. कीड व रोगांमुळे यंदा धान उत्पादनात प्रचंड घट आली आहे. परंतु, बियाणे, वखरणी, खते, कीटकनाशके, मळणी आदींसह मजुरांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्या तुलनेत धानाला कवडीमोल हमीभाव मिळत आहे. परिणामी शेती कसणे कठीण झाले आहे. हमी भावात वाढ होणे गरजेचे आहे." - विनोद पचघरे, शेतकरी, पांजरा (बोरी)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रPaddyभातFarmerशेतकरीfarmingशेती