शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांचा धान व्यापाऱ्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:01 IST

शेतकऱ्यांकडून १५०० ते १६५० रुपये प्रती क्विंटल धानाची खरेदी केली जात आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत सक्रीय झाले असून धान खरेदी करताना सातबारा आणि कोरा विड्रॉल घेतला जातो. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे.

ठळक मुद्देदलाल सक्रीय : शेतकऱ्यांकडून घेतला जातो सातबारा आणि कोरा विड्रॉल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत केंद्रावर धान विकल्यानंतरही दिवाळीपुर्वी चुकारे मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने सण साजरा करण्यासाठी जिल्हयातील अनेक शेतकरी धान व्यापाऱ्याला विकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेतकऱ्यांकडून १५०० ते १६५० रुपये प्रती क्विंटल धानाची खरेदी केली जात आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत सक्रीय झाले असून धान खरेदी करताना सातबारा आणि कोरा विड्रॉल घेतला जातो.भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरी धान येत आहे. शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्रही सुरु झाले आहे. मात्र दिवाळीचा सण अगदी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची चणचण आहे. घरात असलेला धान आधारभूत केंद्रावर दिला तर १० ते १५ दिवस पैसे मिळण्याची शक्यता नाही. त्यातही टोकण व इतर बाबींची पुर्तता करावी लागते. दिवाळीला हातात पैसे नसेल तर सण साजरा कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या घरातील धान व्यापाऱ्यांना विकत असल्याचे दिसत आहे. व्यापारी धान खरेदी करताना आधारभूत किमतीपेक्षाही कमी किमतीतही धानाची खरेदी करीत आहे. १५०० ते १६५० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जाते .त्यातही धान मोजताना शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. धान ओला असल्याचे कारण पुढे करीत ७० किलोच्या कट्ट्यावर दोन किलो अधिक धान घेतले जाते. तसेच वजन काट्यांवरही शेतकऱ्यांना संशय असतो. परंतु दिवाळी सणासाठी पैसे हवे असल्याने शेतकरी मुकाटपणे आपले धान विकुन मोकळे होत आहेत.ग्रामीण भागात सध्या व्यापाऱ्यांचे दलाल गरजवंत शेतकरी हेरुन त्यांच्याकडून धान खरेदी करीत आहेत. धान खरेदी करताना सातबारा. आधारकार्ड झेरॉक्स मागितली जाते. अनेकदा शेतकऱ्यांच्या कोऱ्या विड्रॉलवरही स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. एक प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसत नाही.मजूरी. कापणी बांधणीचे नगदी पैसेल्ल एकीकडे निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हवालदिल असताना जवळ पैसेही नाहीत. मात्र कापणी. बांधणी. मळणीसाठी नगदी पैसे द्यावे लागतात. कोणताही मजूर उधारीवर कामावर येत नाही. त्यामुळेही शेतकऱ्यांवर पैशाची चणचण असते. अनेक शेतकरी धानाच्या भरवशावर आपल्या वर्षभराचे गणित लावत असते. सण समारंभही साजरे करतात. परंतु निसर्गाच्या अवकृपेने धानाला उतारा निम्माच येत आहे.जिल्ह्यातील धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र आता शेतकऱ्यांनी दिवाळीपुर्वी कापणी केली. काही ठिकाणी मळणीही झाली आहे. अशा शेतात पंचनामा करणार कसा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची गरज आहे.- अविनाश ब्राम्हणकर.सदस्य भाजप प्रदेश कार्यकारिणी